मुंबई : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबियांवर, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी १२७ कोटी रुपयांच्या घोटाळ्यांचे आरोप केले आहेत. तसेच, त्यांच्याविरोधात असलेले तब्बल २७०० पानी पुरावे देखील त्यांनी आयकर विभागाकडे सादर केले. यांनतर आता सोमय्या यांनी पुन्हा एकदा नवा खुलासा केला आहे. शनिवारी माध्यमांशी बोलताना त्यांनी, ‘दिवाळीपर्यंतच जनतेला वाट पाहावी लागेल. कारण दिवाळीपूर्वीच देशमुख तुरुंगात जातील,’ असा दावा केला आहे.
कर नाही त्याला डर कशाला, आरोपाला सामोरे जा!
तसेच, त्यांच्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांचा नंबर लागेल आणि मग हसन मुश्रीफ यांच्यावरही कारवाई होणार आहे,’ असे देखील ते म्हणाले आहेत. परब यांनी सोमय्या यांना नोटीस पाठवून माफी मागण्यास सांगितलं होतं. त्यावरही सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली. ‘परब यांची माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. उलट त्यांनीच राज्याच्या साडेबारा कोटी जनतेची माफी मागितली पाहिजे. लॉकडाऊन असताना ते स्वत:चं बेकायदेशीरपणे रिसॉर्ट बांधत होते. याची त्यांना लाज वाटली पाहिजे,’ असा हल्लाबोल त्यांनी केला.
उद्धवा अजब तुझे सरकार,
गृहमंत्री अनिल देशमुख फरार,
पोलीस आयुक्त परमबीर सिंग फरार
पुढे अनिल परब होणार…….
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) September 18, 2021
त्याचसोबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला, मुख्यमंत्र्यांनीही जनतेची माफी मागावी. त्यांनीही त्यांच्या पत्नीच्या नावे १९ बेनामी बंगले बांधले आहेत,’ असं म्हणत त्यांनी, ‘मला आणि माझ्या मुलालाही धमक्या मिळत आहेत. पण मी उद्धव ठाकरेंच्या धमक्यांना घाबरत नाही. या अलिबाबा आणि त्यांच्या ४० चोरांचा घोटाळा बाहेर काढणारच. आम्ही थांबणार नाही,’ असा रोखठोक इशारा त्यांनी दिला.
शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल आणि राज्यात नवीन सरकार येईल!
दरम्यान, सोमवारी सोमय्या कोल्हापूरला जाणार असून, मुश्रीफ यांच्या बेनामी साखर कारखान्याची माहिती ते कोल्हापूरकरांसमोर मांडणार आहेत. दुसरीकडे, सोमय्या यांच्या १२७ कोटीच्या घोटाळ्याच्या आरोपानंतर मुश्रीफ यांनी देखील सोमय्या यांच्यावर १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे.
Read Also :