मुंबई : राजकारण व घोटाळा हे आता आपल्या दररोजच्या बैठकीतले शब्द झाले आहेत. सत्तेतून पैसा व पैश्यातून सत्ता हे जणू समिकरणचं बनलं आहे. महाराष्ट्रात सुद्धा एक प्रकरण असंच गाजत आहे. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्यावर असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची ईडी मार्फत चौकशी चालू आहे. अनिल देशमुख यांना ईडीने यापुर्वी चौकशीची नोटीस बजावली आहे. पण काही तरी कारणं सांगत ते चौकशीला गैरहजर रहात नव्हते. ईडीच्या या चौकशी विरोधात देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण त्यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावत त्यांना चौकशीला सामोरं जाण्याचे आदेश दिले आहेत.
विद्यार्थ्यांच्या समस्या घेऊन हर्षवर्धन पाटलांची कन्या, राज्यपाल कोश्यारी यांच्या भेटीला
अनिल देशमुख यांच्या विरूद्ध अटक वॉरंट इश्यू करावे, त्यांना फरार घोषीत करावे अशी मागणी आता भाजपचे नेते किरिट सोमय्या यांनी ईडीकडे केली आहे. मनी लॉड्रींग प्रकरणी व १०० कोटीच्या वसुली प्रकरणी देशमुख हे दोषी आहेत त्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे ही मागणी पण त्यांनी यावेळी केली आहे.
बैलगाडा शर्यत सुरु करण्यासाठी मी राजकीय आत्महत्या करण्यास तयार, खासदार अमोल कोल्हेंची आक्रमक भूमिका
दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने देशमुख यांची याचिका फेटाळल्यानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. सचिन वाझे यांच्यासोबत देशमुख यांना एकाच कोठडीत राहावं लागेल. एक हजार कोटींच्या बेनामी संपत्तीचा हिशोब त्यांना द्यावा लागेल. असं सोमय्या यावेळी म्हणाले आहेत. मी ईडीला विनंती करतो की, ईडीने लवकरात लवकर देशमुखांना अटक करावी, असही सोमय्या यावेळी म्हणाले आहेत.
Read Also :
- बैलगाडा शर्यत चालू करा; पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांची देवेंद्र फडणवीसांकडे मागणी
- …तोपर्यंत गळ्यात हार आणि डोक्याला फेटा बांधणार नाही; पंकजा मुंडेची आक्रमक भूमिका
- राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे; संदीप देशपांडेंचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल
- पुणे शहराला खड्ड्यात घालवून भाजपची खोटी बॅनरबाजी; राष्ट्रवादी स्पर्धेच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांची पोलखोल करणार
- प्रशासकीय यंत्रणांनी दबावाखाली भेट टाळली, पालघर दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय मंत्री भारती पवारांचा आरोप