मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होत असून, ईडीनंतर आता सीबीयाने देखील अनिल देशमुख यांच्याशी आणि या प्रकरणाशी संबंधित मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि अहमदनगर या शहरांतील १२ ठिकाणांवर, आज छापे टाकत मोठी कारवाई केली आहे. यात दोन बड्या पोलीस अधिकाऱ्यांशी संबंधित ठिकाणांचीही झाडाझडती घेण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
“आता देशाला ‘सच्चे दिन’ दाखवण्याची गरज, सर्व विरोधक एकत्र आले तर ६ महिन्यातच परिणाम दिसतील”
सीबीआयकडून पोलीस दलात उपायुक्त पदावर कार्यरत असलेल्या, राजू भुजबळ यांच्या अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील घरावर, तर सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांच्या पुणे येथील घरावर छापा टाकण्यात आला, तसेच, ईडीची देखील दोन पथके यावेळी त्यांच्यासोबत होती. त्यांनी भुजबळ यांच्या कुटुंबीयांचे जबाब घेतले, तसेच कागदपत्रेही तपासल्याची माहिती मिळत आहे.
CBI conducted raids at 12 locations in Maharashtra in connection with corruption case against former State Home Minister Anil Deshmukh yesterday. Residences of DCP Raju Bhujbal in Ahmednagar & Mumbai and residences of ACP Sanjay Patil in Pune & Mumbai raided: CBI Sources
— ANI (@ANI) July 28, 2021
प्रताप सरनाईक यांच्याविरोधात कारवाई होणार? उच्च न्यायालयाने दिले ईडीला आदेश
अनिल देशमुख यांनी सचिन वाझे याला दरमहा १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिले, असा गंभीर आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आणि त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, देशमुखांची सीबीआयकडून प्राथमिक चौकशी करून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. यांनतर ईडीने देशमुखांसह, त्यांच्या निकटवर्तीयांच्या घरांची झडती घेतली आणि ईडीनेही त्यांच्याविरोधात मनी लाँर्डिंगचा गुन्हा दाखल केला.
पेगासस प्रकरणावरून भाजप विरोधात दिल्लीत एकवटले, महाविकास आघाडीसह सगळे विरोधक
यांनतर पुन्हा एकदा ईडीने देशमुखांच्या मुंबई व नागपूरातील घरांची झडती घेतली. यावेळी त्यांच्या दोन्ही खासगी सचिवांना अटक करण्यात आली. दरम्यान, या कारवाई वेळी ईडीच्या हाती काही कॉल डीटेल्स आणि Whats App चॅट सापडले. त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, देशमुखांना ईडीने ३ वेळा चौकशीससाठी बोलावले, पण त्यांनी वय आणि कोरोनाचे कारण देत चौकशीला जाणे टाळले.
खंडणी प्रकरणी परमबीर सिंग यांची होणार SIT चौकशी, ७ अधिकाऱ्यांच्याद्वारे केला जाणार तपास
दरम्यान, ईडीच्या कारवाईविरोधात देशमुखांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, तर सीबीआयने दाखल केलेला गुन्हा देखील रद्द करण्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, ही याचिका फेटाळण्यात आली. तसेच राज्य सरकारनेही याचिकेतील काही मजकुर वगळण्याची मागणी केली होती, ती देखील न्यायालायने फेटाळून लावली आहे. त्यामुळे अनिल देशमुखांचा पाय आता आणखीन खोलात गेला असल्याचे सांगितले जात आहे.
Read Also :
- राज्य सरकारकडून १४ जिल्ह्यातील कोरोना निर्बंध शिथिल करण्याच्या हालचाली सुरु
- भाजपाला सत्तेपासून रोखण्यसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने केले देशपातळीवर प्रयत्न सुरु
- “फडणवीसांनी उठसूठ बोलण्यापेक्षा अभ्यास आणि संशोधन करून बोलावं”
- नाशिक नोटप्रेस चोरी प्रकरणाचा झाला उलगडा; हाय सिक्युरिटी असूनही गेल्या होत्या ५ लाखांच्या नोटा चोरीला
- मिशन यूपी इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार देशभरातील ओबीसी विद्यार्थ्यांना देणार मोठा दिलासा