मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकार बँक कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी, ईडीने मोठी कारवाई केली असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी आणि त्यांचे मामा राजेंद्र कुमार घाडगे यांच्याशी संबंधित, साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, यामुळे आता विरोधकांकडून त्यांच्यावर हल्लाबोल केला जात असून, यासंबंधी ज्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली, ते ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही यावर भाष्य केले आहे. “अजित पवारांचं नाव आत्ता आलं. आम्ही तर कधीपासून त्याबाबत बोलतोय. आता ईडीने लक्ष घातल्यावर सगळं काही बाहेर पडेल”, अशी तिखट प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.
उभारणीपासून ते आतापर्यंत चर्चेत असणाऱ्या जरंडेश्वर साखर कारखान्याची ‘१८ वर्षांची’ अशी आहे लढाई
दरम्यान, त्यांच्या या प्रतिक्रियेवर काँग्रेस नेत्यांनी टीका केली असून, “आमच्या सरकारने फडणवीस सरकारमधल्या अनेक मंत्र्यांचे भ्रष्टाचार बाहेर पुराव्यानिशी बाहेर काढले. तेव्हा अण्णा हजारेंची निद्रावस्था भंग झाली नाही. राफेलच्या आवाजाने, शेतकऱ्यांच्या आक्रोशाने, महागाईच्या वणव्यानेही ते ढिम्म हलले नाहीत,” असा घणाघात महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. तसेच, “राज्यातले सरकार बदलले आणि आता कुठे आमच्या काळात, अण्णा ७ वर्षांच्या कुंभकर्णीय निद्रेतून खडबडून जागे झाले आहेत,” अशी देखील टीका त्यांनी केली आहे.
“अजित पवारांचं नाव आम्ही कधीपासून घेतोय, ईडीने लक्ष घातलंय ना…आता सगळं काही बाहेर निघेल”
तसेच, “दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनात अण्णा हजारे उपोषणाला बसणार होते. पण विरोधी पक्षनेते फडणवीसांनी त्यांची भेट घेऊन, त्यांचं मन वळवलं आणि ते बसले नाहीत. तेव्हापासून हजारे भाजपच्या टीमचा भाग आहेत, असा त्यांच्यावर आरोप होत आहे. अण्णा हजारे हे महाराष्ट्रातील हास्यास्पद व्यक्तिमत्त्व आहेत,” अशी टीका काँग्रसे नेते डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केली आहे.
मला प्रश्न विचारायचे असतील तर आधी मुख्यमंत्रीपदावर बसवा?
“या प्रकरणाची माहिती जेव्हा बाहेर आली, तेव्हा अण्णा हजारे यांनी याचिकाकर्ता म्हणून आज प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हा दावा केला. तसेच, “या प्रकरणात आम्ही कधीपासून त्यांचं नाव घेत आहोत. पण, मी फकीर माणूस. माझं ते कोण ऐकतोय. आता सगळं बाहेर पडेल असा आम्हाला विश्वास आहे. आता त्यांनी ४९ साखर कारखान्यांची चौकशी करावी. आम्ही ४ हजार पानांचं कारखान्यांचं रेकॉर्ड उच्च न्यायालयात दाखल केलं आहे. ते आता सत्र न्यायालयात आहे आणि योगायोगाने हे प्रकरण ईडीने हातात घेतलं आहे. साखर कारखान्यातील भ्रष्टाचाराची चौकशी होणं अंत्यंत महत्त्वाचं आहे. कारण सहकार चळवळ टिकली पाहिजे, तिचं खासगीकरण होता काम नये,” अशी भावना अण्णा हजारेंनी या कारवाईनंतर व्यक्त केली आहे.
Read Also :
- बंडातात्या यांच्यावर केलेल्या कारवाईचा देवेंद्र फडणवीसांकडून निषेध
- शिवसेना नेते सुभाष देसाईंच्या खात्यात भ्रष्टाचार? नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांना ‘लेटरबॉम्ब’
- जिल्हा परिषद निवडणुकांसदर्भातील याचिकेवर ६ जुलै रोजी होणार सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
- देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील गाडीला आग; सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही
- दिल्लीला जाताना वय आणि कोरोना आड येत नाही का? देशमुखांच्या दिल्लीवारीवर उठले सवाल