रायगड : पोलादपूर तालुक्यातील केवनाळे, सुतारवाडी येथे गुरुवारी रात्री दरड कोसळून ११ जणांचा मृत्यू झाला आहे. १३ जखमींना पोलादपूर आणि महाड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अतिवृष्टीने रायगड जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले आहे. महाड-तळई येथे दरड कोसळून आतापर्यंत 36 जणांचे मृत देह बाहेर काढण्यात आले आहेत. अद्यापही मोठ्या संख्येने नागरिक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच पोलादपूर येथील केवनाळे येथे चार घरांवर दरड कोसळली. त्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर सुतारवाडी येथेही दरड पडल्याने पाच असा एकूण ११ जणांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही गावातील १३ जखमींना महाड आणि पाेलादपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, आता रायगडमध्ये या अतिवृष्टीमुळे मोठी दुर्घटना घडली असून, महाड तालुक्यातील तळई गावात ३५ घरांवर दरड कोसळून तब्बल 3६ जणांचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे, तर सुमारे आणखीन ८०-९० लोकं ढिगाऱ्याखाली गाडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. काल संध्याकाळी ४ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, या घटनेतील ३२ लोकांचा जागीच मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती सांगितली जात आहे.
Read Also :
- “कोकण बुडत असताना राज्यकर्ते मात्र पार्ट्या झोडताय” अनेकांनी व्यक्त केला संताप
- कोल्हापुरात पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली, आमदार ऋतुराज पाटील भर पावसात पूरग्रस्तांच्या भेटीसाठी
- राज्याला लोकांचं हित जोपासणारा मुख्यमंत्री हवा, ड्रायव्हर नको, नारायण राणे यांची खोचक टीका
- सांगली पालिकेकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन, कृष्णा नदीची पाणीपातळी ३० फुटांवर
- वर्षभरात कोकणात तिसऱ्यांदा फटका, राज्य सरकारने आता तरी मदत करावी; फडणवीसांची मागणी