अकोला : दंगलीचे राजकारण हे कोणत्याही देशासाठी विकासाला अडथळा ठरतो. यामुळे दंगली रोखणे ही आपली सगळ्यांची सामुहिक जबाबदारी आहे. या करीता वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र च्या वतीने सर्वांना कळकळीचे आवाहन करण्यात येत आहे की, दंगली पसरू देऊ नका, शांतता व सलोखा राखा असं वंचित बहुजन आघाडीने म्हटलं आहे. औरंगाबाद येथील राज ठाकरे यांच्या सभेपुर्वी वंचित बहुजन आघाडीने कार्यकर्त्यांना सुचना केल्या आहेत.
“राज ठाकरे यांनी सभेपुर्वी इफ्तार पार्टीला यावं”; इम्तियाज जलील यांचं राज ठाकरेंना आमंत्रण
नोटबंदी आणि लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य माणूनस महागाईने व बेरोजगारीने होरपळून गेला आहे. अशा वेळी धर्म आणि जातीच्या नावाने दंगली पेटवण्याचे षड़यंत्र काही जातीवादी शक्ती करत आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही आवाहन करत आहोत की आपपल्या परिसरात आपसातला सलोखा व कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे.
“राजकीय खेळात अनेकजण उंच उड्या मारण्याचा प्रयत्न करताहेत”; मनसे-भाजप युतीबाबत भुजबळांची प्रतिक्रिया
धार्मिक स्थळांवरचे भोंगे काढून टाका असा कायदा अथवा सर्वोच्च न्यायालयाचा कोणताही आदेश नाही. धार्मिक स्थळे असो की कार्यक्रम समारंभ असो, पोलिसांची रितसर परवानगी घेऊन, सांयकाळी दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत भोंगे वापण्यास बंदीचा आणि शांतता झोन व सामान्य परिसरामध्ये विशिष्ठ डेसिबल तीव्रतेचा नियम पाळून लाऊडस्पीकर वापरण्यास, भोंगा काढूनच टाकने हा कायदेशीर वा समजदारीचा मार्ग होणार नाही. कोणत्याही धार्मिक स्थळी, उत्सव समारंभात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची कडक अमंलबजावणी करावी असी आमची भूमिका असल्याचंही ते म्हणाले.
“त्यांचे बंधू मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत महाराष्ट्राचं कौतुक करायचं नाही, असे बहुतेक त्यांनी ठरवलंय”
दरम्यान, राजकीय स्वार्थापोटी धार्मिक दंगली पेटवणाऱ्या षड़यंत्रला बळी पडू नका, अफवा पसरवू नका, कायदा व सुव्यवस्था टिकवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आपल्या सोबत राहतील , कुठेही काहीही अनुचित प्रकार दिसून आल्यास आमच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना संपर्क साधा आपल्या विभागात शांतता व कायदा सुव्यवस्था टिकून ठेवण्यासाठी आम्ही आपल्या सोबत पुर्ण सहकार्य करू,असं त्यांनी म्हटलं आहे.
Read also:
- “मुख्यमंत्र्यांची अवस्था सध्या गजनीसारखी”; उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्याला मनसेकडून प्रत्युत्तर
- विरोधकांचा समाचार, तर हिंदुत्वाचा ज्वलंत मुद्दा, राज ठाकरे औरंगाबादच्या सभेत काय बोलणार?
- “…मग त्यांना गटांगळ्या खाव्या लागतील”; संजय राऊतांचा विरोधकांना सुचक इशारा
- “राष्ट्रवादी ही चाळीस चोरांची टोळी, त्यांच्या गुहेत दोन चोरांचे साथीदार”; खोतांचा पुन्हा एकदा टोला
- “राज ठाकरे बाळासाहेबांच्या भट्टीतून तयार झालेलं रसायन, त्यांच्या ज्वालांमध्ये कोण कोण भस्स होणार?