नवी दिल्ली : मोदींसोबत व्यवस्थित चर्चा झाली असून त्यांनी सर्व विषय गांभीर्याने ऐकून घेतले आहेत. याबाबत जीएसटी भरपाई आणि पीक विम्याचा विषय त्यामध्ये समाविष्ठ करण्यात आला होता. महाराष्ट्रातील पीक विम्याचा विषय प्रामुख्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः मांडला. चालू वर्षी बीड पॅटर्न महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशातही लागू करावा. जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला पिक विमा मिळण्यास विलंब होणार नाही, अशीही विनंती त्यांनी यावेळी केली.
“महाराष्ट्राला २४ हजार ३०६ कोटी जीसएटी भरपाई मिळणं बाकी आहे. करोनाचं संकट सर्वांवर असून आर्थिक दिलासा देण्यासाठी हे पैसे लवकर मिळाले तर फायदा होईल,” असं अजि पवार यांनी यावेळी सांगितलं. वादळाचा फटका बसल्यानंतर मदतीचे निकष बदलण्याची गरजही यावेळी मोदींकडे बोलून दाखवण्यात आली. २०१५ चे नियम आपण बदलण्याची गरज असल्याचं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं असल्याची माहिती अजित पवारांनी दिली. तसंच १४ व्या वित्त आयोगातील थकीत १ हजार ४४ कोटींचा निधी तात्काळ मिळावी, अशी मागणी केल्याचं अजित पवारांनी सांगितलं.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी पंतप्रधानांसमोर राज्यातील संवेदनशील विषय मांडले असल्याची माहिती दिली. मराठा आरक्षण, मागावसर्गीयाचं बढतीमधील आरक्षण, मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्गमधील जागेची उपलब्धतता. जीएसटी परतावा, पीक विमा, मराठी भाषेला अभिजात दर्जा याबद्दल मोदींशी चर्चा झाल्याचं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, तुमच्याकडे अधिकार असताना निर्णय घ्यावा आणि मराठा समाजाला न्याय द्यावा अशी विनंती मोदींना करण्यात आल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. मराठा असो किंवा ओबीसी आरक्षण असो घटनादुरुस्ती किंवा कायदेशीर मार्ग असतील सकारात्मक भूमिका घ्यावी असं सांगितलं असल्याचं अशोक चव्हाण म्हणाले आहेत.
Read Also :
- आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा शिथील करावी; उद्धव ठाकरेंची मोदींकडे मागणी
- उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदींची भेट… दिल्लीतील पत्रकार परिषदतीचे महत्वाचे मुद्दे…
- उद्धव- मोदींची भेट म्हणजे ढकला ढकलीचे राजकारण; विनायक मेटेंचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात
- उद्धव- मोदींच्या भेटीवर चंद्रकांत पाटील-फडणवीस शकुनी डाव टाकणारच
- ठाकरे-मोदी भेटीतून मराठा आरक्षणावर नक्कीच तोडगा निघेल – संजय राऊत