मुंबई: मराठवाडा वॉटर ग्रीड महत्वकांक्षी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला तत्वतः मंजुरी मिळली आहे. मराठावाडा वॉटर ग्रीड प्रकल्पामुळे लातूर,बीड,औरंगाबाद जिल्हयातील पाण्याच्या समस्या मिटणार आहेत. शेतकरी वर्गासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. Marathwada Water Grid Project मराठवाडा वॉटरग्रीड प्रकल्पाची मागणी ही अनेक वर्षांपासून करण्यात आलेली होती. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मराठवाड्यातील नेत्यांनी एकजूट दाखवली आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी या मागणीला योग्य प्रतिसाद देत प्रकल्पाला हिरवा कंदील दिला आहे.
मराठवाड्यातील पाणीप्रश्न हा संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. लातूर सारख्या जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती असताना रेल्वे ने पाणी नेऊन लातूरकरांची पाणी समस्या काही वर्षांपूर्वी सोडविण्यात आली होती. मराठवाड्यातील पाणी प्रश्न हा कायमचा सोडविण्यासाठी मंत्रालयातील संबंधित विभाग आणि मराठवाड्यातील मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक घेतली होती. या प्रकल्पासाठी स्वर्गीय मुख्यमंत्री विलास राव देशमुख यांचे पुत्र मंत्री अमित देशमुख यांनी विशेष पुढाकार घेतला होता.
आज झालेल्या बैठकीदरम्यान मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाला गती मिळावी अशी मागणी देखील मंत्री अमित देशमुख यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. यावेळी राज्याचे पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील,सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे तसेच जलसंधारण मंत्री ना. शंकरराव गडाख, रोहयो फलोत्पादन मंत्री ना.संदिपान भुमरे आदी उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी प्रकल्पाच्या बाबतीत सकारत्मक भावना प्रदर्शित केल्यामुळे अजित पवार यांनी विलंब न करता या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला तत्वतः मंजुरी दिली आहे. Approval of Marathwada Water Grid Project to quench the thirst of Marathwada
मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प म्हणजे काय? What is Marathwada Water Grid Project?
मराठवाड्याचा दुष्काळ हटवण्यासाठी इस्रायलच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. कायम दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाड्यासाठी पिण्याचे पाणी, शेतीचे पाणी आणि उद्योगांच्या पाण्याचं एकत्रित ग्रीड करण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यात दमनगंगा-पिंजाळ, तापी-नार-पार आणि कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी आणि कृष्णा खोऱ्यातील 7 टी. एम. सी. पाणी मराठवाड्याकडे वळविण्याचे नियोजन आहे. मराठवाडा ग्रीडमध्ये 1 हजार 330 किलोमीटर मुख्य पाईपलाईन असेल. यात 11 धरणे (जायकवाडी धरण, निम्न दुधना धरण, सिध्देश्वर धरण, येलदरी धरण, इसापुर धरण, विष्णूपुरी धरण, माजलगाव धरण, निम्न मनार, मांजरा, निम्न तेरणा धरण व सिना कोळेगावधरण, ) लूप पद्धतीने जोडण्यात येतील. त्यानंतर जलशुद्धीकरणाची प्रक्रिया करुन तालुक्यापर्यंत शुद्ध पाणी वाहून नेण्यासाठी 3 हजार 220 किलोमीटर दुय्यम पाईप लाईन प्रस्तावित आहे.