मुंबई : प्रकल्पासाठी महाराष्ट्रातील जागाच योग्य आहे असे वेदांता-फॉक्सकॉन ग्रुपच्या अहवालात असतानाही हा प्रकल्प गुजरातमध्ये गेला. महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. यामुळे राज्य सरकार बाबतीत अनेक प्रश्न निर्माण होतात. महाराष्ट्र योग्य असतानाही कोणाच्या हट्टामुळे महाराष्ट्राच्या विकासाला विरोध होत आहे ? नुकसान होत असतानाही कंपनीचे गुजरातला जाणे दिल्लीतील महाशक्तीच्या दबावामुळे आहे का? केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून महाराष्ट्राच्या विकासाला ब्रेक लावत आहेत का?, असा सवाल काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी राज्य व केंद्र सरकारला केला आहे.
उत्तर प्रदेशमधील मथुरेथील साधू कर्नाटकला देवदर्शनासाठी आले. त्यानंतर ते विजापुरवरून जत तालुक्यातील लवंगामार्गे पंढरपुरला जात असताना. मुलं चोरणारी टोळी समजून त्यांना सांगलीत जमावाने चांगलीच मारहाण केली. त्यावरून स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून मिरवणाऱ्या भाजपाने पालघरच्या घटनेनंतर धार्मिक वळण देऊन वावटळ उठवून राज्यात अस्थिरता निर्माण केली होती. मग आता सत्तेत बसलेले हे स्वघोषित हिंदुहृदयसम्राट सांगलीत घडलेल्या साधूंच्या मारहाण प्रकरणी मूग गिळून गप्प का?, असा सवाल नाना पटोलेंनी शिंदे-फडणवीस सरकारला आहे.
“पतीव्रताच नसेल तर दागिने घालून काय फायदा?”खडसेंचा शिंदेंना खोचक टोला
सोबतच, एकनाथ शिंदे यांच्यावर चौफेर टिका होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पापेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देणार असल्याचं त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यावर बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, हातचं सोडून पळत्याच्या मागे लागण्यात अर्थ नाही. राज्याने केंद्राला सांगावं की भविष्यात जो मोठा प्रकल्प तुम्ही महाराष्ट्राला देऊ करता आहात, तो आमच्या एखाद्या अविकसित भागात द्याच. पण अगोदर पळवून नेलेला वेदांता-फॉक्सकॉन परत करा, भविष्यातील मोठ्या प्रकल्पाचं निव्वळ चॉकलेट देऊ नका, असा टोला काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी शिंदे-पडणवीस सरकारला लगावला आहे.
Read also
- “..तर निवृत्त न्यायधिशांमार्फत चौकशी करा”; आशिष शेलारांचा मागणी
- “नाणार, जैतापूर, बुलेट ट्रेन, मेट्रो कारशेड रखडवणारा गद्दार कोण?”; भाजपचा शिवसेनेला सवाल
- “भविष्यातील मोठ्या प्रकल्पाचं निव्वळ चॉकलेट देऊ नका”; अशोक चव्हाण भाजपवर संतापले
- “भगवान गडावर दसरा मेळावा घेणारच, करूणा मुंडे ठाम”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी चर्चा
- “अटक करावी, नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझी माफी मागावी”