मुंबई : पैसे वाटून बनावट टीआरपी वाढवण्याऱ्या ‘रिपब्लिक’ चॅनेलच्या अर्णब गोस्वामी यांना अटक करा, अशी मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. मुंबई पोलीस आयुक्त परम बीर सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन रॅकेटचा पर्दाफाश केला.
“सत्यमेव जयते! ‘फक्त मराठी’ आणि ‘बॉक्स टीव्ही’च्या चालकांप्रमाणेच लोकांना पैसे देऊन बनावट टीआरपी वाढवण्याऱ्या ‘रिपब्लिक’ चॅनेलच्या अर्णब गोस्वामी यांना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी मी मुंबईचे पोलीस आयुक्त परम बीर सिंह यांच्याकडे करतो.” असे ट्वीट प्रताप सरनाईक यांनी केले आहे.
सत्यमेव जयते!
फक्त मराठी व बॉक्स टीव्हीच्या चालकांप्रमाणेच लोकांना पैसे देऊन बनावट टीआरपी वाढवण्याऱ्या @republic चॅनेलच्या अर्णव गोस्वामीला लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी मी मुंबईचे पोलीस आयुक्त @CPMumbaiPolice यांच्याकडे करतो. #FakeTRP #RepublicTV— Pratap Sarnaik (@PratapSarnaik) October 8, 2020
टेलिव्हिजन चॅनेल्सच्या टीआरपीमध्ये फेरफार करणाऱ्या रॅकेटचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. बीएआरसी आणि हंसा या कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यांकडून हे रॅकेट चालवण्यात येत होते. या माध्यमातून फक्त मराठी, बॉक्स सिनेमा आणि रिपब्लिक टीव्ही या वाहिन्यांना अवैधरित्या वाढीव टीआरपीचा लाभ मिळाला होता, अशी माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दिली.
याआधी, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ‘असत्यमेव जयते’ म्हणत रिपब्लिक वाहिनीला टोला लगावला होता.
Mumbai police commissioner held a press conference just now saying interalia that Republic TV purchased TRPs
असत्यमेव जयते!!!— Sanjay Raut (@rautsanjay61) October 8, 2020
याप्रकरणी फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमाच्या चालकांना अटक करण्यात आली आहे. तर रिपब्लिक टीव्हीचा टीआरपी वाढवण्यासाठीही रॅकेट चालवणाऱ्यांकडून मदत घेण्यात आल्याची माहितीही समोर आल्याचे परमबीर सिंह यांनी सांगितले. त्यामुळे आता रिपब्लिक टीव्हीच्या प्रवर्तकांची चौकशी करण्यात येईल.
काय आहे प्रकरण?
“रिपब्लिक टीव्हीचा टीआरपी वाढवण्यासाठी काही लोकांना पैसे देऊन आपल्या घरात दिवसभर हे चॅनेल सुरु ठेवण्यास सांगण्यात आले होते. यासाठी प्रत्येकी 400 ते 500 रुपये दिले जात असत. त्यामुळे चॅनेलच्या टीआरपीत मोठी वाढ दिसून आली होती. याचा थेट फायदा जाहिराती मिळवण्यासाठी होत असे. त्यामुळे आता या टीआरपीच्या आधारे संबंधित चॅनेल्सला मिळालेल्या जाहिरातींचीही चौकशी केली जाईल. तसेच हे जाहिरातदारही या रॅकेटमध्ये सहभागी होते का, याचा तपास केला जाईल” अशी माहिती परमबीर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.
Read Also :
रामदास आठवलेंकडून मुंबईतील बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांची भेट, आर्थिक मदतीची घोषणाhttps://t.co/dQZc35sKK0 @RamdasAthawale
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 8, 2020