मुंबई : काश्मीरमध्ये कलम 370 पुन्हा लागू करण्यासाठी चीनची मदत घेण्याची भाषा करणाऱ्या फारुख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांना शिवसेना नेते संजय राऊत यांनी चांगलेच फैलावर घेतले आहे. माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती असो किंवा फारुख अब्दुल्ला असोत, कोणीही चीनची मदत घेऊन भारतीय संविधानाला आव्हान देण्याची भाषा करत असेल तर त्यांना शिक्षा झालीच पाहिजे.
तेव्हा फारुख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्तींना अटक करुन 10 वर्षांसाठी अंदमानात काळ्या पाण्याच्या शिक्षेवर पाठवा. मुळात ते अशाप्रकारचे वक्तव्य करुन बाहेर फिरुच कसे शकतात, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
मेहबुबा मुफ्तींच्या वक्तव्यानंतर वादंग
जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा पुन्हा दिला जात नाही तोपर्यंत मी तिरंगा हातात धरणार नाही, असे वक्तव्य ‘पीडीपी’च्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी केले होते. त्यांनी जम्मू काश्मीरचा जुना ध्वज परत देण्याची मागणीही त्यांनी केली होती. त्यांच्या या वक्तव्याविरोधात जम्मू काश्मीरमध्ये त्यांना चांगलाच विरोध होताना दिसतोय. या वक्तव्याचा निषेध करत ‘पीडीपी’च्या तीन प्रमुख नेत्यांनी पक्षाचा राजीनामाही दिला होता.
दरम्यान आम्ही सगळे तीनही पक्ष महानगरपालिकांच्या निवडणुका महाविकास आघाडी सोबतच लढणार असल्याची घोषणा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे. याबाबत आयोजित एका पत्रकार परिषदेत त्यांनी हा खुलासा केला आहे. कारण मागील काही दिवसांपासून शिवसेना व राष्ट्रवादीत खटके उडत होते, आता त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊतांच हे वक्तव्य फार महत्वाचं मानलं जात आहे.
सरकार लोकनियुक्त आहे, लोकांनी निवडून दिलेलं सरकार आहे, कोणत्याही प्रश्नासाठी पहिल्यांदा संबंधित खात्याच्या मंत्र्यांना त्यानंतर मुख्यमंत्र्यांना भेटलं पाहिजे, राज्यपालांना कार्यकार अधिकार नाही त्यामुळे महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन राज्यपालांना भेटणं हाच महाराष्ट्राचा अपमान आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना टोला लगावला आहे पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे भाष्य केले आहे.
Read Also :
'या' कारणामुळे शरद पवार यांची भर पावसातील सभा पुन्हा चर्चेत,रोहित पवार यांनी देखील केले ट्विटhttps://t.co/aipo0xo3Gp#SharadPawar #NCP #RohitPawar #AjitPawar #SupriyaSule
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 31, 2020