बीड : कोरोना संकटाच्या काळात वाढीव वीज बिलावरून ठाकरे सरकारला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. यातच आता एखादा अधिकारी नागरिकांसोबत मग्रूरपणे वागत असेल तर खपून घेतले जाणार नाही, असा इशारा उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिला आहे.
नितीन राऊत यांनी मराठवाड्यात ऑक्सिजन प्लांटची पाहणी केली. यावेळी बीडमध्ये बोलताना ते म्हणाले की, कोरोना काळात नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. पण अशावेळी एखादा अधिकारी नागरिकांसोबत मग्रूरपणे वागत असेल तर त्यांची मग्रुरी खपवून घेतली जाणार नाही.
कोरोना काळात नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. मात्र सरकार म्हणून नागरिकांसह शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम सरकारने केले आहे. यामुळे एखादा अधिकारी जर नागरिकांसोबत मग्रूरपणे वागत असेल, तर अशा अधिकाऱ्यांना खपवून घेणार नाही, असे राऊत म्हणाले.
तसेच, मान्सूनच्या काळात ज्या-ज्या ठिकाणी वीज खंडित होते तेथे योग्य व्यवस्था रहावी, नागरिकांना मदत व्हावी. तसेच नागरिकांच्या तक्रारी इंजिनिअरच्या व्हॉट्सअप ग्रुपवर जावी अशी तरतूद केली. सर्व ग्राहकांना विनातक्रार वीज वितरण सेवा देताना कोणत्याही प्रकारचा विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आदेश देखील त्यांनी दिले.
Read Also :
- ‘अजितदादा म्हणतात कोण लाल आहे जो सरकार पाडेल, मी म्हणतो तो लाल अजित पवारच आहेत’
- मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबाबत महायुतीचे नेतेही पंतप्रधान मोदींना भेटणार
- ‘चंद्रकांत पाटलांना उत्तर देणे मी रास्त समजत नाही, फडणवीस बोलल्यावर बघू’
- ‘भाजपमध्ये गेलेले नेते पुन्हा काँग्रेसमध्ये येण्यास इच्छूक, पण…’
- ‘शिवसेनेला वचन पळणारा मित्र म्हणणे ही पवारांची राजकीय हतबलता’