पुण्यातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून तब्बल 200 कोटी रुपयांचा खर्च होत असताना, राज्य शासन याबाबत गंभीर नसून, महापालिकेला केवळ 3 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने महाविकास आघाडी आकसाने राजकारण करत असल्याची टीका भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली.
महापालिकेने आतापर्यंत सुमारे 200 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. तर राज्य शासनाने केवळ 3 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. महापालिकेचा आजपर्यंत झालेला खर्च, कोरोना रुग्णांसाठी रुग्णालयाची निर्मिती, महापालिकेच्या रुग्णालयात अतिदक्षता विभागाच्या सुविधा निर्माण करणे, त्यासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देणे, पुढील काळात कोरोनावर नियंत्रण आणणे आदी कामांसाठी राज्य शासनाने कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा अशीही मागणी मुळीक यांनी केली आहे.
मुळीक म्हणाले, ‘राज्य शासनाने निधीचे वितरण करताना महापालिकेच्या वर्गवारीचा निकष न लावता उपचार घेणार्या रुग्णांच्या संख्येचा विचार करावा. पुणे शहरात आजपर्यंत पॉझिटिव्ह रुग्ण संख्या हजार इतकी असून, हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. अक्टिव्ह रुग्णांची संख्या हजार इतकी आहे. मुंबईच्या धर्तीवर पुण्यात रूग्णालये उभारण्याची सूचना पालकमंत्री अजित पवार यांनी केली आहे.