नवी दिल्ली : एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं, आणि भाजपसोबत एकनाथ शिंदे यांच्या गटाने सत्ता स्थापन केली. आज एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कऱण्यात आला. मात्र बिहारमध्ये भाजपसोबतची युती नितीश कुमार यांनी तोड़ली आहे. त्यामुळे एकीकडे महाराष्ट्रात आनंदाउत्सव साजरा केला जात आहे तर बिहारमध्ये भाजपच्या गोटात दुख: व्यक्त केलं जात आहे.
TET घोटाळ्याची टांगती तलवार; तरी देखील अब्दुल सत्तारांना शिंदे सरकारमध्ये लागली लॉटरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित झालेल्या मुख्यमंत्री पदाच्या बैठकीत नितीश कुमार गैरहजर होते. त्यामुळे एनडीएच्या दोन मित्रपक्षांमध्ये काहीतरी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. लालूंचा राजद, काॅंग्रेस आणि डाव्या आघाडीसोबत नितीश कुमार पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्याच्या प्रयत्नात असल्याने त्यांनी भाजपसोबतची युती तोडली असल्याचं बोलण्यात येत आहे. त्यामुळे बिहारमध्ये मोठा भुकंप आला आहे.
एकनाथ शिंदें सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी; शिंदेकडून 8 तर भाजपकडून 8 मंत्री
2015 मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांनी राष्ट्रीय जनता दल आणि काॅंग्रेससोबत महाआघाडी केली. जदयु आणि राजदने 101 जागांवर निवडणुक लढवली. तर 80 जागांवर विजय मिळवला. जदयूने 71 जागांवर ताबा घेतला. नितीश कुमार महाआघाडीचे नेते बनले आणि पाचव्या वेळा मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. त्यानंतर 29 जुलै 2017 मध्ये बिहारमध्ये नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. आणि भाजपसोबत त्यांनी सरकार स्थापन केलं. तेव्हा देखील त्यांना मुख्यमंत्री पद देण्यात आलं.
औरंगाबादमधील 6 आमदारांनी सो़डली साथ, ठाकरेंकडून आंबादास दानवेंना मोठी जबाबदारी
दरम्यान, तेजस्वी यादवचे मामा प्रभुनाथ यादव यांनी असं म्हटलं आहे की, तेजस्वी यादव हे बिहारचे पुढेच मुख्यमंत्री असतील आणि नितीश कुमार हे पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून पाहायला मिळतील. सध्या बिहारमध्ये मुख्यमंत्री हा जेदयुचा तर उपमुख्यमंत्री , गृहमंत्री पदासह आरजेडी आणि विधानसभा अध्यक्ष काॅंग्रेस कडे जाण्याची शक्यता आहे. तसेच भाजपचे आज 12 आमदार राज्यपालांची भेट घेऊन राजीनामा देणार असल्याची बातमी देखील समजत आहे.
Read also
- “शिंदे-फडणवीस सरकारचा मोहरमच्या मुहुर्तावर मंत्रिमंडळाचा विस्तार”; शिवसेनेची टिका
- ABVP कार्यकर्ता ते कॅबिनेट मंत्री; चंद्रकांत पाटीलांची राजकीय कारकिर्द एकदा वाचाच
- “ज्योतिषाचा व्यवसाय सोडून चंद्रकांत पाटील विज्ञानवादी व सत्तार हिंदूत्वासाठी काम करतील”
- “योगायोगाने रक्षाबंधन जवळच, चित्राताई आता पवित्र झालेल्या भावाला नक्की ओवाळतील”
- मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात अपक्ष आमदारांना डावललं; बच्चू कडूंची भूमिका काय?