पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसने विजयी व्हावे यासाठी स्वतः पक्षाध्यक्ष शरद पवार यांना यावे लागले. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे आणि आमदार रोहीत पवारही प्रयत्न करत आहेत. पिंपरी चिंचवड शहरात भारतीय जनता पार्टी किती भक्कम आहे, याचे हे उदाहरण आहे. शहरातील परिस्थिती हाताळण्यास भाजपाचे नेतृत्व सक्षम आहे, असा टोला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांना लगावला आहे. ते पिंपरी येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी माजी मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते.
माजी आमदार विलास लांडेंचा समंजसपणा; आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अजित गव्हाणेंचे गुडघ्याला बाशिंग
ते म्हणाले, पिंपरी चिंचवडमधील भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये तथा आमदारांमध्ये काही अंतर्गत धुसफूस चालू आहे. ती सोडपवण्यासाठी सक्षम आहोत. ती कशी सोडवायची याची काळजी पवारांनी करायची गरज नाही. पवारांना उलट आनंद झाला पाहिजे. आम्हाला सोडून काही नगरसेवक इतर पक्षात गेले. त्यांना कशा पक्षाताप होईल याची काळजी आम्ही घेवू. पण पवारांना खुद्द पिंपरी चिंचवडमध्ये लक्ष घालावे लागतायं, हे आश्चर्याची बाब आहे, असेही ते म्हणाले.
सर्वच साखर कारखान्यांच्या विक्रीची चौकशी करा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पुण्यात जाहीर केलेल्या सर्व ६५ साखर कारखान्यांच्या विक्रीची अवश्य चौकशी करा. केवळ जरंडेश्वरची चौकशी करा आणि उरलेल्या ६४ कारखान्यांची करू नका अशी आमची भूमिका नाही, असे प्रत्युत्तर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी दिले. चंद्रकांत पाटील म्हणाले की, जरंडेश्वर साखर कारखान्याचे प्रकरण काळा पैसा पांढरा करण्याचे आहे व त्याची चौकशी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी करत आहे. ऊर्वरित साखर कारखान्यांचे प्रकरणही मनी लाँडरिंगचे असेल तर त्याचीही चौकशी करावी. उपलब्ध माहितीनुसार इतर कारखान्यांची विक्री कमी किंमतीला झाल्याची तक्रार आहे. त्याची चौकशी करताना त्या विक्रीमध्ये महत्त्वाची भूमिका असलेल्या राज्य सहकारी बँकेची आणि त्या बँकेचे संचालक असलेल्या अजित पवार यांचीही चौकशी होणे आवश्यक आहे. या गैरव्यवहाराला मौन संमती देणाऱ्या त्या वेळच्या सत्ताधाऱ्यांची आणि मदत करणाऱ्या नेत्यांचीही चौकशी करावी.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्हाला हरवणे सोप्पे नाही, हे विरोधकांना देखील माहित आहे म्हणूनच स्वतः पवारसाहेबांना महानगरपालिकेच्या निवडणुकीत लक्ष घालावे लागत आहे. pic.twitter.com/ZN1ASGxk2w
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) October 23, 2021
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक यांनी त्यांना धमकीचा फोन आल्याची तक्रार केली आहे, त्याविषयी पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. त्यामुळे नवाब मलिक यांनी केवळ तक्रार करण्यापेक्षा राजस्थानमधील सरकारच्या मदतीने धमकी देणाऱ्याचा शोध घेऊन त्याला शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करावेत.
एक एकर शेतात गांजा लागवडीसाठी परवानगी द्या; शेतकऱ्याच पत्र
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत भाजपाची युती होईल का, असे एका पत्रकाराने विचारले असता प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, संपूर्ण देश एक आहे, अशी भाजपाची भूमिका असून मनसेची परप्रांतियांची भूमिका भाजपाला मान्य नाही. त्यामुळे मनसेसोबत भाजपाची युती होण्याची सुतराम शक्यता नाही. संभाजी ब्रिगेडसोबत भाजपाची युती होण्याचा काहीही प्रस्ताव आलेला नाही. त्याबाबत आपण केवळ वर्तमानपत्रातून वाचले. असा प्रस्ताव आला तरीही भाजपाची संभाजी ब्रिगेडशी युती होण्याची शक्यता आपल्याला वाटत नाही, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.
Read Also :
- मोठी बातमी: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण; आईंचीही टेस्ट आली पॉझिटिव्ह
- तुमच्यात हिंमत असेल तर औरंगाबादच नाव संभाजीनगर करून दाखवाच – खासदार इम्तियाज जलील
- शिवसेनेच्या बॅनरवरुन चक्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा फोटो गायब; संजय राऊतांचा मात्र भला मोठा फोटो
- पिंपरी चिंचवडमधील 700 कोटीच्या भ्रष्टाचारात भाजप आमदाराच्या कंपनीचा हात; संजय राऊतांचा दावा
- सत्ता टिकविण्यासाठी तुमच्या वाघाचा ससा होतो का? गोपीचंद पडळकरांचा राऊतांवर हल्लाबोल