नांदेड: महाविकास आघाडी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरु जनतेच्या डोळ्यात धुळफेक करित आहे. नांदेडमधील अधिवेशात याच मुद्यांवरून सरकारला धक्का देऊ, असे प्रतिपादन भाजपचे माजी मंत्री आमदार आशिष शेलार यांनी केले. ते मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांंनी आयोजित केलेल्या बैठकीत बोलत होते. यावेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार राम पाटील रातोळीकर, राजेश पवार, डॉ.संतुक हंबर्डे आदींची उपस्थिती होती.
महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रिय कारभारामुळे तसेच मराठा उपसमितीचे अध्यक्ष असणाऱ्या पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या मनमानी कारभारामुळे सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकले नाही. योग्य पुरावे सादर न केल्याने न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण नाकारण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यास अपयशी ठरलेले महाविकास आघाडीचे नेते या बाबत केंद्र सरकारकडे अंगुलीनिर्देश करत समाजाच्या डोळ्यात धूळफेक करत आहेत.
भाजप प्रदेश कार्यालयाने महाविकास आघाडीच्या सरकारने केलेल्या चुका सर्वसामान्यांना निदर्शनास आणून देण्याची जबाबदारी काही नेत्यांकडे सोपविली आहे. नांदेड व बीड जिल्ह्यची जबाबदारी माजी मंत्री आशिष शेलार यांच्याकडे देण्यात आली असून ते गुरुवारी नांदेडमध्ये दाखल झाले. शुक्रवारी आमदार शेलार यांच्या उपस्थितीत मराठा समाजातील प्रमुख नेत्यांसमवेत शासकीय विश्रामगृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षणाबाबत केलेली धूळफेक तसेच विविध संघटनांनी मांडलेली बाजू यामुळे मला ऊर्जा मिळाली आहे.
अजित पवारांनी नारायण राणे यांचे मराठा आरक्षणावरून कां टोचले
नारायण राणे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी का नाही दिलं आरक्षण? ही काय पद्धत झाली का? हे इतक्या वेळी मुख्यमंत्री होते, ते तितक्या वेळी मुख्यमंत्री होते. इतर वेळी म्हणायचं शरद पवार आमचे नेते आहेत, शरद पवारांचं वाकून दर्शन घ्यायचं आणि नंतर आपण काहीतरी वेगळं सांगतोय, असं करून शरद पवारांबद्दल अशाप्रकारचं वक्तव्य करायचं, असे अजित पवार म्हणाले.