गणपतीसाठी कोकणात लाखो चाकरमानी जात असतात. आता त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना परवानगी देणार की नाही? लालबागचा राजा आणि गणेशभक्त यांची ताटातूट केली त्याचप्रमाणे कोकणवासियांची ही राज्य सरकार ताटातूट करणार का? असा सवाल भाजपचे आमदार अॅड. आशिष शेलारांनी पत्राच्या माध्यमातू विचारला आहे.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना परवानगी देणार की नाही? लालबागचा राजा आणि गणेशभक्त यांची ताटातूट केली त्याचप्रमाणे कोकणवासियांची ही राज्य सरकार ताटातूट करणार?
सरकार कधी निर्णय घोषित करणार? ई-पास कधी पासून उपलब्ध होणार? कोरंटाईन करणार कि अँटीबॉडी टेस्ट करणार?(1/2) pic.twitter.com/iNw40jjOfB— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 24, 2020
रेल्वे मंत्री यांच्याशी आम्ही चर्चा केल्याप्रमाणे ते गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना विशेष रेल्वे गाड्या उपलब्ध करून देण्यास तयार आहेत. राज्य सरकारने अद्याप का मागणी केलेली नाही?
राज्य सरकार सगळ्याच बाजूने कोकणी माणसाची कोंडी का करतेय?
(2/2) pic.twitter.com/jARHbfYlOf— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 24, 2020
ग्रामपंचायतीना कोरंटाईन सेंटरमध्ये गरम पाणी,शौचालये,औषधांसाठी ना विशेष निधी दिला. ना गणेशोत्सवाबाबत वेळीच निर्णय जाहीर केला,रेल्वे मंत्री विशेष गाड्या सोडायला तयार पण राज्य सरकारची मागणीच नाही.ग्रामस्थ आणि चाकरमान्यांत दरी वाढतेय.आमच्या कोकणी माणसांशी का राज्य सरकार असे वागतेय?
ग्रामपंचायतीना कोरंटाईन सेंटरमध्ये गरम पाणी,शौचालये,औषधांसाठी ना विशेष निधी दिला. ना गणेशोत्सवाबाबत वेळीच निर्णय जाहीर केला,रेल्वे मंत्री विशेष गाड्या सोडायला तयार पण राज्य सरकारची मागणीच नाही.ग्रामस्थ आणि चाकरमान्यांत दरी वाढतेय.आमच्या कोकणी माणसांशी का राज्य सरकार असे वागतेय? pic.twitter.com/kJDWk3frhl
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 24, 2020