5 ऑगस्ट रोजी राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. काही ठराविकच लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. यावरून एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
या कार्यक्रमाला पंतप्रधानांनी उपस्थित राहणे हे संविधानाच्या शपथेच्या विरोधात आहे. संविधानाचा धर्मनिरपेक्षता हा महत्त्वाचा भाग आहे. ४०० वर्षांपर्यंत अयोध्येत बाबरी मशीद उभी होती. पण १९९२ मध्ये ती काही गुन्हेगारांच्या गटाने पाडली हे आम्ही विसरणार नसल्याची टीका ओवेसी यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आ
5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन केलं जाणार आहे. ते सकाळी साडे अकरा वाजता या ठिकाणी पोहोचतील. त्यानंतर ते सर्वांना संबोधित करणार आहे. या कार्यक्रमात जवळपास निमंत्रितांसह 200 जण सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्यांची यादीही पंतप्रधान कार्यालयाला सोपवण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.