मुंबई: काँग्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांच्या निवासस्थानी सोमवारी रात्री भोजन समारंभ आयोजित करण्यात आला होता. या भोजन समारंभाच्या निमित्ताने अनेक नेते एकत्र जमले होते. यावेळी २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाला पुन्हा सत्ता मिळवण्यापासून रोखणं आणि काँग्रेस पक्षाचं पुनरुज्जीवन या दोन प्रमुख मुद्यांवर चर्चा झाली.
हे पण वाचा: आमच्याकडे क्यूआर कोड, पास तपासण्याची यंत्रणा नाही; राज्य सरकारनेच ती उभारावी – रावसाहेब दानवे
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, समाजवादी पार्टीकडून अखिलेश यादव, रामगोपाल यादव, सीपीआय-एमकडून सीताराम येचुरी, सीपीआयकडून डी राजा, नॅशनल कॉन्फरन्सकडून ओमर अब्दुल्ला, पी. चिंदबरम असे दिग्गज नेते या डिनर कार्यक्रमाला उपस्थित होते. शिवसेनेकडून संजय राऊतही हजर होते. काँग्रेसमध्ये संघटनात्मक फेरबदल करण्यासाठी मागच्यावर्षी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहिणारे ‘ग्रुप २३’ चे सदस्यही या डिनर कार्यक्रमाला उपस्थित होते.
हे पण वाचा: २०१४ पासून देशाला ग्रहण लागलं, लोकशाहीच्या चारही स्तंभाचे स्वातंत्र्य धोक्यात – नाना पटोले
वेगवेगळ्या पक्षाचे वरिष्ठ नेते एकत्र जमले होते. विरोधकांची एकजूट भक्कम करणं तसचं पुढच्यावर्षी होणारी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक आणि २०२४ लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. सूत्रांनी ही माहिती दिली. कपिल सिब्बल यांचा नुकताच वाढदिवस झाला. त्या निमित्ताने या डिनर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
हे पण वाचा: महाराष्ट्र पेटवायला दोन मिनिटं सुद्धा लागणार नाही, संभाजीराजे म्हणतात…..
या निमित्ताने नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधकांची आघाडी भक्कम करण्याबद्दल चर्चा झाली. “एकजूट अधिक भक्कम करण्यासाठी अशा बैठका सातत्याने झाल्या पाहिजेत. भाजपाला सर्वप्रथम २०२२ मध्ये उत्तर प्रदेशात त्यानंतर २०२४ लोकसभा निवडणुकीत पराभूत करायचे आहे” असे बैठकीला उपस्थित असलेल्या एका विरोधी पक्षाच्या नेत्याने सांगितले.
Read Also :
- बीड जिल्ह्यामधून निघणाऱ्या डॉ. भागवत कराड यांच्या ‘जनआर्शिवाद’ यात्रेला, पंकजा मुंडेसह कार्यकर्त्यांचा विरोध
- पुन्हा एकदा फडणवीसांची खेळी: संजय कुटे होणार भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष?
- महाराष्ट्र पेटवायला दोन मिनिटं सुद्धा लागणार नाही, संभाजीराजे म्हणतात…..
- शिवसेनेच्या ‘या’ मंत्र्याची माणिकराव ठाकरे यांनी केली तक्रार; आघाडीत धुसफूस?
- दिल्लीत भाजप नेत्यांची महत्वपूर्ण बैठक, राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड होण्याची शक्यता?