लातूर : लातूर जिल्ह्यात आपला पक्ष चांगल्या प्रकारे वाढू शकतो. आपण मोठ्या प्रमाणावर क्रियाशील सभासद नोंदणी केली तर नोंदणी झालेल्या आकडेवारीनुसार आपल्याला जिल्ह्यातील सर्वच कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये संधी देण्याचा प्रयत्न करू शकतो, असे जयंत पाटील यांनी सांगितले. तुम्हाला तुमचा सन्मान टिकवायचा असेल तर पक्षाला ताकद देणे ही तुमची नैतिक जबाबदारी आहे. प्रत्येकाने सभासद होणे आवश्यक आहे. पक्षाचा विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवून घरोघरी जाऊन नोंदणी केली तर एक प्रकारे पक्षाचा प्रचार होईल, असे मार्गदर्शन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले.
“आम्ही ५० जण बाजीगर होतो, त्यामुळे आम्हाला गद्दार म्हणायच्या भानगडीत पडू नका”; शहाजी पाटिल
आमदार संजय बनसोडे कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले, आपल्या जिल्ह्यात प्रत्येक गावात आपले कार्यकर्ते आहेत. आपण त्यांना भेटून त्यांच्या माध्यमातून प्रत्येक गावातून सभासद नोंदणी केली पाहिजे. गावागावात मंडप टाकून सभासद नोंदणी केली तर आपल्या पक्षाचा सभासद होण्यास जनतेतून रीघ लागलेली दिसेल. भारतीय जनता पार्टीला टक्कर देण्याची ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे, असे लोकांना वाटते. आपण सर्वांनी एकत्र येऊन जनतेचा विश्वास सार्थ ठरवूया, असे आवाहन त्यांनी केले.
पत्राचाळमधील सर्व पैसे राऊतांनी ‘ठाकरे’ चित्रपटात वळवले; इडीचा दावा, राऊत अडचणीत
माजी मंत्री संजय बनसोडे व माझ्या मतदारसंघात आपण लोकसभा निवडणुकीत पिछाडीवर होतो, परंतु आम्ही जनतेत राहुन लोकांच्या कामात राहिलो. त्यानंतर परिस्थिती बदलली आणि आम्ही दोघेही आमदार बनलो. जनतेची कामे केल्याशिवाय जनता आपल्याला महत्व देत नाही. त्यामुळे जनतेच्या सेवेत कायम रहा, यश नक्की मिळेल, असे मार्गदर्शन लातूर जिल्हाध्यक्ष आमदार बाबासाहेब पाटील यांनी केले.
यावेळी माजी खा. जयसिंगराव गायकवाड, प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, आशाताई भिसे, युवक प्रदेश कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, चंदन पाटील, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष मोहमद खान पठाण, निरीक्षक डॉ. नरेंद्र काळे, शहराध्यक्ष मकरंद सावे, औसा नगराध्यक्ष अफसर शेख, मुर्तजा खान, प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.
Read also
- रामदास आठवलेंच्या पक्षातील सचिवांनी केला शिवसेनेत प्रवेश; थेट पक्षचं केलं सेनेत विलीन
- “टपरीवर काम केलं नाही, पण मी कुणाला चुना लावला नाही”; गुलाबराव पाटलांच्या टिकेला खडसेंचं उत्तर म्हणाले,,,:
- “जर निर्मला सीतारामण यांना वेळ असेल, तर मी स्वत: फिरून त्यांना बारामती दाखवेन;” सुप्रिया सुळे
- “महाराष्ट्रातील जनता कोणाबरोबर आहे? हे दसऱ्याच्या दिवशी दिसेल”; शंभुराज देसाई
- “तर आम्ही उद्धव ठाकरे यांचं स्वागत करू”; खासदार राहुल शेवाळे यांचं वक्तव्य