बीड – मराठवाड्यातील दुसऱ्या क्रमांकाचा म्हणून अंबा सहकारी साखर कारखान्याची ओळख आहे. याच अंबाजोगाई येथील अंबा सहकारी साखर कारखान्याने यापूर्वी साखर कारखान्याचे 25 एकर जमीन विकली आहे आणि आता पंधरा वर्षासाठी हा साखर कारखाना खासगी कंपनीला चालवण्यासाठी देऊन हा साखर कारखाना पवारांच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा आरोप कामगार नेते आणि माजी आमदार माणिकराव जाधव यांनी केला आहे. ते अंबा सहकारी साखर कारखान्याच्या परिसरामध्ये आयोजित ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगारांच्या बैठकीत बोलत होते.
प्रदीप कंद यांच्या विजयाचे अजित पवारांनी एकदा आत्मपरीक्षण करावे; बाळा भेगडेंचा सणसणीत टोला
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या व कामगारांच्या थकीत पैशा संदर्भात व अंबासाखर कारखाना विनाविलंब चालू झाला पाहिजे आदी मुद्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. 4 महिन्यांपासून शेतकरी व कामगारांच्या प्रश्नांवर येथील कारखाना प्रशासनाने व संचालक मंडळाने कुठलीही दखल न घेतल्याने शेतकरी व कामगार आक्रमक झाले आहेत.
आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांचे बंधू अडचणीत; ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल, काय आहे नेमक प्रकरण…
अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याच्या चालू होत असलेल्या गळीत हंगामात कुठलाही प्रकारचा अडथळा न येऊ देता तो कारखाना सुरळीत चालला पाहिजे. तसेच तो कारखाना विद्यमान संचालक मंडळानेच सक्षम पद्धतीने चालवला पाहिजे, कोणत्याही खाजगी एजन्सीला अथवा त्रयस्थ व्यक्तीला कारखाना भाड्याने अथवा विक्री करून चालवायला देऊ नये, विद्यमान संचालक मंडळाला कारखाना चालू करण्यास काही अडचणी असतील तर आम्ही त्यास सर्वतोपरी मदत करू असा विश्वास माजी आमदार माणिक राव जाधव यांनी व्यक्त केला आहे.
Read also:
- काँग्रेस आमदार आपल्याच मंत्र्यांवर नाराज, पटोलेंना डावलून थेट दिल्लीत जाणार?
- परदेशातून आलेल्या नागरिकांची पुणे विमानतळावर होणार आरटीपीसीआर चाचणी.!*
- केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांना कोरोनाची लागण
- बेनकेंसोबत झालेल्या राड्यावर सोनवणे स्पष्टच बोलले; महाविकास आघाडीत शिवसेनेला अपमानित केलं जातयं
- आम्ही गोट्या खेळत होतो का? पुण्यात भरकार्यक्रमातच शिवसेना -राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये हमरीतुमरी