ठाणे : राष्ट्रावादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे माजी अंगरक्षक पोलीस हवालदार वैभव कदम यांनी आत्महत्या केली आहे. त्यामुळे सध्या ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे. वैभव कदम यांच्या आत्महत्या केल्यानंतर भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी याबाबत चौकशी करण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा…“१९ महिन्यांचा तुरूंगवास, पाच वेळा आमदार, खासदार, संघाचा कार्यकर्ता,” गिरीश बापटाचा संघर्षमय प्रवास
वैभव कदम यांनी निळजे ते तळोजा या रेल्वे मार्गिकेदरम्यान रेल्वेगाडीखाली येऊन आत्महत्या केल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला आहे. ते सध्या मुंबई पोलीस दलात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत होते. जितेंद्र आव्हाड मंत्री होते, त्यावेळी वैभव कदम त्यांचे अंगरक्षक म्हणून कार्यरत होते. यातच अनंत करमुसे मारहाण प्रकरणात कदम यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर ते जामीनावर सुटले होते.
हेही वाचा…पुण्यातील राजकारणातल्या ‘किंग मेकर’ ची अखेर प्राणज्योत मालवली, खासदार गिरीश बापटाचं निधन
दरम्यान, वैभव कदम यांच्या आत्महत्येनंतर मोहित कंबोज यांनी ट्विट करत चौकशी करण्याची मागणी केली आहे. ही आत्महत्या नसून हत्या असल्याचं त्यात म्हटलं आहे. तसेच हे प्रकरण मनसुख हिरेन २.० असल्याचा दावा मोहित कंबोज यांनी केला आहे.हायप्रोफाईल व्यक्तीला वाचवण्यासाठी सामान्य व्यक्तीचा बळी गेल्याचा त्यांनी आरोप केला आहे.
मेरी बिनती है मुख्यमंत्री @mieknathshinde ji और उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी से , तुरंत FIR दर्ज होनी चाहिए Vaibhav Kadam केस में , जो पुलिस वाले हमारी सुरक्षा करते है अगर वह सुरक्षित नहीं हैं या उनको न्याय नहीं मिले गा तो जनता का क्या ! pic.twitter.com/i7femL2dzb
— Mohit Kamboj Bharatiya – #IAmSavarkar (@mohitbharatiya_) March 29, 2023
Read also
हेही वाचा…“साहेबांच्या जाण्याने पुणे पोरकं झालं”, गिरीश बापटांच्या निधाननंतर चंद्रकांत पाटील भावूक
हेही वाचा…“मंत्रीपद अन् पालकमंत्रीपदावरून तानाजी सावंत नाराज, शिंदे गटात आलबेल नाही”?
हेही वाचा…“गिरीश बापट हे एक नम्र आणि कष्ठाळू नेते होते” पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून बापटांना भावपूर्ण श्रध्दांजली
हेही वाचा…चिंता नसावी..! संजय राऊतांनी सोनिया गांधी अन् राहुल गांधींची घेतली भेट
हेही वाचा“शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवारांकडून बापटांना भावपुर्ण श्रद्धांजली”,म्हणाले की…,