कन्या कुमारीपासून क्षीर भवानिपर्यंत, सोमनाथपासून ते काशी विश्वनाथपर्यंत, बोधगयेपासून अमृतसरपर्यंत, लक्ष्यद्विपपासून लेहपर्यंत आज संपूर्ण भारत राममय, प्रत्येक मन दिपमय आहे. शतकांची प्रतीक्षा आज पूर्ण होत आहे. राम जन्मभूमी आज मुक्त झाली आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. राम मंदिराच्या भूमिपूजनानंतर ते उपस्थितांना संबोधित करत होते.
ज्याप्रमाणे देश स्वातंत्र्य साठी गांधीजींना अनेक लोकांनी सहयोग केला होता त्याच प्रमाणे राम मंदिरासाठी देखील अनेक लोकांचा सहयोग असल्याचा सुतोवात देखील यावेळी पंतप्रधान मोदींनी केला. तसेच देशभरातील मंदिरातून आणलेली माती आणि पवित्र नद्यांचे पाणी आज येथील एक अमोग शक्ती बनली असल्याचे देखील यावेळी पंतप्रधानांनी सांगितले.
राम मंदिर निर्माणासाठी अनेक पिढ्यानी आयुष्य वेचलं गेल्या कित्येक वर्षांचं स्वप्न आज साकार होतंय त्यामुळे हा सोहळा जणू न भूतो ना भविष्यती आहे असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन झालं. यावेळी त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल, सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते. या सोहळ्याला १७५ जण हजर होते. देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सोहळ्यासाठी अतिशय मोजक्या व्यक्तींना निमंत्रित करण्यात आलं आहे.