मुंबई : सध्या राज्यातलं राजकारण, विविध समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यांवरून तापलेलं आहे. खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वात, मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाने, मराठा क्रांती मुक मोर्चाला सुरवात कलेची असून, दुसरीकडे ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा आणि पदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावरून छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली, आज आंदोलन सुरु करण्यात आलं आहे. तिकडे, गोपीचंद पडळकरांनी देखील धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा लावून धरला असून, राज्यात घोंगडी आंदोलन करून हा मुद्दा तेवत ठेवला आहे.
हे पण वाचा, ‘आजच्या चर्चेतून हवा तो तोडगा निघाला नाही, तर काय होईल हे सांगायची गरज नाही’
दरम्यान, या सगळ्यामुळे ठाकरे सरकार चांगलंच अडचणीत आलं असून, आहे. यातच आता आघाडी सरकारमधील ऊर्जामंत्री आणि काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांनी, पदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘पदोन्नतीतील आरक्षण रद्द करून, अनसूचित जाती-जमाती, विमुक्त जाती, भटक्या-विमुक्त जमाती आणि बहुजन मागास समाजाला वेठीस धरणारे, हे झारीतील शुक्राचार्य कोण आहेत,’ असा सवाल करत त्यांनी, ‘या शुक्राचार्यांचे पितळ उघडं पडल्याशिवाय राहणार नाही,’ असा इशारा त्यांनी दिला आहे.
हे पण वाचा, केंद्रानं इंपेरिकल डाटा द्यावा, राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार- छगन भुजबळ
तसेच, ‘या विषयावर २१ जूननंतर बोलणार असून, आम्ही महाराष्ट्र ढवळून काढणार आहोत. सध्या जिथे जाऊ तिथे ‘आरक्षण’ या विषयावर जनता आम्हाला प्रश्न विचारू लागली आहे. आम्ही मराठा आरक्षणाला पूर्णपणे समर्थन दिलं आहे. मात्र, तरीही राज्य सरकार हे आरक्षण मिळवून देण्यात कमी पडत आहे, असं दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे,’ असं सांगत, ‘हे आरक्षण रद्द झाल्यानं, जे नुकसान झालं आहे, त्याचं समर्थन केलं जाणार नाही. मात्र, भारतीय संविधान आणि राज्यघटनेने ज्यांना आरक्षण दिलं आहे, त्यांना ते मिळणार नाही, यासाठी सातत्यानं प्रयत्न केले जात आहेत,’ असा आरोपही त्यांनी केला आहे.
हे पण वाचा, राजकीय नेत्यांच्या मुखी ‘मराठा’ असला तरी मराठ्यांच्या हाती मात्र ‘खराटाच
यावेळी, ‘काँग्रेसचे धोरण संविधानाच्या बाजूने आणि संविधानानुरुप आहे. या सरकारमध्ये सामील होण्याआधी, आम्ही त्यावर चर्चा केली आणि मगच आम्ही या महविकास आघाडी सरकारमध्ये सामील झालो. त्यामुळे, आमचे सरकार स्थापन होत असताना, किमान समान कार्यक्रम तयार झाला आणि त्याचे जे नियम आणि निकष आहेत. त्या अनुषंगाने, न्याय मागणे आमचं काम असून, आता सरकारच्या तिन्ही पक्षांच्या कोअर कमिटीत हा विषय ठेवला आहे. त्यामुळे, २१ तारखेपर्यंत आम्ही थांबून आहोत आणि यांनतर यावर स्पष्ट भूमिका घेतली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
Read Also :
- ‘आघाडी सरकार आरक्षणविरोधी, मंत्रीच आरक्षणाचा वाद पेटवताहेत’
- मराठा आरक्षण : संभाजीराजेंची कोपर्डीकडे पुन्हा नव्याने वाटचाल
- “.अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील”; खासदार उदयनराजेंचा पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना इशारा
- भाजप-शिवसेना वाद : किशोरी पेडणेकरांकडून बाळासाहेबांचा व्हिडीओ ट्वीट, व्हिडीओत बाळासाहेब म्हणत आहेत…
- एनआयए कडून एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांना अटक, आजच सेशन कोर्टात हजर करणार