शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी जाणार की नाही यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. उद्धव ठाकरे राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या या कार्यक्रमासाठी अयोध्येला नक्कीच जातील, असं मत त्यांनी व्यक्त केलं
‘राम मंदिराचं भूमिपूजन आवश्यक आहे. ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो आला आहे. अयोध्येचा कार्यक्रम शासकीय आहे. उद्धव ठाकरे राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या या कार्यक्रमासाठी अयोध्येला नक्कीच जातील’, असं मत त्यांनी व्यक्त केलं
संजय राऊत म्हणाले, “शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे राम मंदिर आंदोलनाचे शिल्पकार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन पुढे गेलं. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने राम मंदिराची निर्मिती होणार आहे. त्यामुळे राम मंदिराचं भूमिपूजन आवश्यक आहे. ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो आला. अयोध्येचा कार्यक्रम हा शासकीय कार्यक्रम आहे. उद्धव ठाकरे नक्कीच अयोध्येत जातील.”