कोरोना व्हायरसमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून देशात लॉकडाऊन होता. या लॉकडाऊनमध्ये प्रत्येकजण आपआपल्या घरातच होते. लॉकडाऊनच्या काळात बाळासाहेबांची आठवण येत असे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे.
कोरोनावरून संजय राऊत यांनी शरद पवार यांनाना प्रश्न विचारल की, या सर्व परिस्थितीत कधी बाळासाहेब ठाकरेंची आठवण येते का? यावेळी उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, बाळासाहेबांची कामाची पद्धत तुम्हाला अधिक माहीत आहे. बाळासाहेब देखील काही घराच्या बाहेर पडून कुठे गेलेले असायचे नाही. मात्र ते घालवत असताना सहकाऱ्यांना बरोबर ठेवून त्यांना प्रोत्साहित करून परिस्थितीला कसे तोंड द्यायचे हे बाळासाहेबांनी नक्कीच शिकवलेले होते.”
पवार म्हणाले की, लॉकडाऊनच्या काळात माझ्यासारख्याला या दोन महिन्यांत बाळासाहेबांची आठवण यासाठी होती की आपण घराच्या बाहेर तर पडायचे नाही. मात्र ज्या दिशेने आपल्याला जायचेय त्या दिशेने जायच्या प्रवासाची तयारी केली पाहिजे आणि ते बाळासाहेब करायचे त्यामुळे त्यांची आठवण या काळात अधिक झाली.