मुंबई : २०१९ साली राज्यात विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला. निकाल हा सर्वपक्षीय लागला होता असं म्हणायला हरकत नाही. शिवसेना पक्षप्रमुख यांना युती तोडून सत्तेत शिवसेनेचा मुख्यमंत्री बसविण्याची संधी चालून आली होती. असं असताना भारतीय जनता पक्ष देखील तिकडून कमालीचा त्रास देण्याचे काम करत होता.
पहिली ते बारावीच्या सर्व शाळा १ डिसेंबरपासून सुरू होणार; शिक्षण मंत्र्यांची माहिती
त्यातच उद्धव साहेबांनी सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या बाजूने राजकीय चाणक्य आणि जेष्ठ नेते शरद पवार यांनी कमान सांभाळली. सरकार येणार असं वाटत असताना अचानक अजित पवारांनी फडणवीसांसोबत पहाटेचा शपथविधी घेतला. मात्र शरद पवार ठाकरेंच्या बाजूने उभे राहिल्याने गेम पलटली. पहाटेच्या शपथविधीवेळी अजित पवार यांच्यासोबत जे आमदार गेले होते, ते एकएक परत येत होते.
‘देशमुखांच्या सांगण्यावरून पोलीस खात्यात रुजू झालो’; सचिन वाझेंचा खळबळजनक जबाब
त्यात अगदी सध्याचे मंत्री धनंजय मुंडेही होते. जी जी नाव येत होती, ते सर्वजण परत आले. त्याचवेळी भारतीय जनता पक्षाकडून निरोप येत होते, जे सरकारमध्ये असताना पाच वर्षे आम्हाला बोलायला टाळायचे, ते आमच्याशी बोलायला लागले. कशाला पवारांबरोबर जाता, असे ते आम्हाला म्हणत होते. पण, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची इच्छा होती. ठाकरे आणि पवार एकत्र आले, तर देशाचे राजकारण बदलेल, असे बाळासाहेब म्हणाले होते. बाळासाहेबांची ती इच्छा मी पूर्ण केली, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले . अजित दादांचा शपथविधी झाल्यावर सगळे जण संजय राऊतला शिव्या देत होते. म्हणत होते की याने पक्ष बुडवला.
स्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेसला झटका; राष्ट्रवादीने उचललं मोठं पाऊल..
मात्र दुसऱ्या दिवशीच महाविकास आघाडीचे सरकार उदयास येण्यास सुरुवात झाली. तीन पक्षाचे सरकार अस्तित्वात येणार का याबाबत आमच्या पक्षातही शंका होती. काही आमदारांमध्ये अस्वस्थता होती. कुणाला माहीत नव्हतं, काय सुरु आहे ते. पण, मी, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना माहीत होतं काय चाललं होते ते. शिवसेनेत मला आणि उद्धव ठाकरेंना माहीत होतं, आम्ही काय करतोय आणि काय चाललं आहे. आमच्या फक्त मोजकचं बोलणं होत होतं, असा किस्सा संजय राऊत यांनी एका वाहिनीशी बोलताना सांगितला आहे.
Read Also :
- ठरलं तर…! विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईतच होणार; राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय
- ‘भाजपचे नेते एसटी कर्मचाऱ्यांची दिशाभूल करून भडकवत आहेत’, मलिकांचा आरोप
- प्रमुख नेत्यांबद्दल एकेरी उल्लेख करता तुमचं कर्तृत्व काय? संजय राऊतांचा सदावर्तेंना रोखठोक सवाल
- आम्हाला नक्षलवादी होण्याची परवानगी द्या; हिंगोलीतील शेतकऱ्यांची मुख्यमंत्री ठाकरेंकडे मागणी
- ‘तुटेपर्यंत ताणू नका, एकदा तुटलं तर जोडणार नाही’; अनिल परब यांचा इशारा