मुंबई : केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाला भेट दिली होती. त्यानंतर शिवसैनिकांनी स्मृती स्थळावर गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केलं होतं. नारायण राणे यांनी आज या प्रकारावरून शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. शिवसेना प्रमुखांच्या स्मृती स्थळाची अवस्था आधी पाहा. स्मृती स्थळ दलदलीत आहे. आधी ते पाहा. मग शुद्धीकरण करा. गोमूत्रं शिंपडून शुद्धीकरण करण्यापेक्षा आधी स्वतचं मन शुद्धीकरण करा, असा हल्ला नारायण राणे यांनी चढवला.
आता तरी देव आम्हाला पावणार का? १५ लाख देणार का? देव चोरला म्हणत राष्ट्रवादीचे आंदोलन
नारायण राणे पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर घणाघाती टीका केली. फक्ता गोमूत्रं आणि गोमूत्रं या एकाच विषयासाठी आलो आहोत का? मला कुणाला नमस्कार करावा वाटतो, कुणासमोर विनम्र व्हावं वाटतं हा माझा प्रश्न आहे. ते गोमूत्रं ज्यांना शिंपडायचं त्यांना शिंपडू द्या. ज्यांना प्यायचं त्यांना पिऊ द्या. त्यात माझा काय संबंध आहे. ज्यांनी शिंपडलं त्यांना विचारा. काय दुषित झालं होतं. एवढं जर स्मारकाचा अभिमान असेल ना ते स्मारक ज्या स्थितीत आहेत. तिथे जाऊ शकत नाही. पँटवर करून मी आत गेलो. दलदलीत ते स्मारक आहे. राज्याचे मुख्यमंत्री त्यांचे आहेत. अनेक स्मारकं मी पाहिलं. अत्यंत सुशोभित असतात. लॉन आहे. फुलझाडं आहेत. इथे काय आहे. इथे तर फोटोही साहेबांचा दिसत नाही. जे गोमूत्रं शिंपडायला आले ना त्यांनी जागतिक किर्तीचं स्मारक करण्याचा प्रयत्न करावा. गोमूत्रं शिंपडून शुद्धीकरण करण्यापेक्षा आधी स्वतचं मन शुद्धीकरण करा. मग कारभार करा, असं राणे म्हणाले.
अब्दुल सत्तार आणि माझे पैसे एकत्र करू म्हणावं, बघू कोण हरतं; रावसाहेब दानवेंचं ओपन चॅलेंज
राणेंना येऊ देणार नाही असा इशारा शिवसेनेने दिला होता. पण मी पोहोचलो. तिथे कुणीही नव्हते. उद्धव ठाकरेही नव्हते. मी असतो तर उभा राहिलो असतो, अडवलं असतं. हे काय आहे. पाच सहा जणांना दोनशे दोनशे रूपये देऊन शुद्धीकरणासाठी पाठवलं. तिथे ब्राह्मण हवा होता शुद्धीकरणासाठी आमच्याकडे भरपूर आहे. आम्ही घेऊन गेलो असतो, असा टोलाही त्यांनी लगावला. राणे यांनी काल लालबागच्या रॅलीत आपलं पद हे शेवटचं पद आहे, असं म्हटलं होतं. त्यावर राणेंनी आज खुलासा केला. मी मंत्री म्हणूनच राहणार आहे. हे शेवटचं पद आहे, म्हणजे संपलं नाही. हे शेवटचं नाही. लगे रहो, असं राणे म्हणाले.
Read Also :
- आमदार महेश लांडगेंचा “गनिमी कावा” : सांगलीत अखेर बारी झालीच; बैलागाडा शर्यतीचा लढा!
- “…तेव्हाच मी ईडीच्या चौकशीला सामोरे जाईन,” अनिल देशमुखांनी दिलं पहिल्यांदाच थेट उत्तर
- “आम्हाला फक्त ब्रह्मज्ञान आणि त्यांच्याकरता कोरडे पाषाण”, फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला
- ….त्यामुळेच भाजपने नेत्यांनी ‘जन आशीर्वाद’ यात्रा काढली, अब्दुल सत्तारांचा मोठा दावा
- “बाळासाहेब आज हवे होते, म्हणाले असते…” नारायण राणेंनी व्यक्त केल्या भावना