सांगली : उत्तर प्रदेशमधील मथुरा येथील चौघे साधू कर्नाटकला देवदर्शनासाठी आले. त्यानंतर ते विजापुरवरून जत तालुक्यातल्या लवंगामार्गे पंढरपुरला जात असताना सांगलत त्यांना मारहाण कऱण्यात आली. मुलं चोरणारी टोळी समजून त्यांना जमावाने चांगलीच मारहाण केली. त्यावरून आता राज्यात सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक झाले आहेत.
सांगलीमध्ये साधूसंतासोबत जी दुर्दैवी मारहाण झाली. त्याच्बरोबरच जो काही अभद्र प्रकार घडला तो अतिशय निंदनीय आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या भूमीत साधू संतांचा अपमान कधीही खपवून घेतला जाणार नाही. पालघर हत्याकांडात निर्दोष सांधूवर तत्कालीन फेसबुक लाईव्ह मुख्यमंत्री आणि त्यांच्या सरकारने अन्याय केला. त्यांचा प्रखर हिंदू विरोध देशाने पहिला आहे. मात्र वर्तमान सरकार हे साधू संतांचा सन्मान करणारे सरकार आहे. दोषींना कठोर शासन केले जाईल असं भाजप नेते राम कदम यांनी म्हटलं आहे.
“शहाजी पाटलांनी माझ्याकडे यावं, त्यांना मातोश्रीवर चांगली खुर्ची देतो”
पालघर साधू हत्याकांडात भाजपच्या सत्तेतील गावातील भाजप पदाधिकारी होते. मुलं चोरणाऱ्या टोळीच्या अफेवतून हत्या झाली असतानाही गलिच्छ राजकारण करणाऱ्या भाजपने मविआची हिंदू विरोधी म्हणून बदनामाी केली. त्याच अफवेतून जतमध्ये सांधूना मारहाण झाली. आता सरकार कोणाचे? सीबीआयकडे केस देणार का ? असा सवाल काॅंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी केला आहे.
“सांग सांग भोलानाथ हा बालिश प्रश्न शेलारांनी मुनगंटीवारांना विचारला पाहिजे”; सेनेचं प्रत्युत्तर
दरम्यान, पंढरपुरकडे जाण्याचा रस्ता विचारले असता तरूणाला मुलं चोरणारी टोळी असल्याचा सांधूवर संशय आला. त्यानंतर त्या तरूणांनी ही सर्व माहिती गावकऱ्यांना दिली. त्यानंतर संपप्त ग्रामस्थांनी सांधूना गाडीतून बाहेर काढू बेदम मारहाण केली. त्यांना लाठी काठी आणि पट्ट्याने जबर मारहाण करण्यात आली. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Read also
- शिंदेंच्या बंडखोरीनंतर मोठा राजकीय भुंकप..! माजी मुख्यमंत्र्यांसह काॅंग्रेसचे 8 आमदार करणार भाजपमध्ये प्रवेश
- “राज्यात उलटा प्रवास सुरु होणं हे चांगलं लक्षण नाही?”; राज ठाकरेंनी शिंदे सरकारला फटकारलं
- संजय शिरसाठांना पुन्हा एकदा डावललं..! शिंदे गटाच्या नियुक्त्या जाहीर
- “हे सरकार हार-तुरे अन् उत्सवांमध्ये व्यस्त, विरोधकही काही बोलत नाहीत”; राजू शेट्टी आक्रमक
- “पोलीस ठाण्यात जाऊन माझं काम मी इमानदारीनं केलंय”; नवनीत राणा