औरंगाबाद :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ८ जून रोजी मराठावाडा सांस्कृतिक मंडळावर जाहीर सभा होणार आहे. यासाठी शिवसेनेकडून युद्ध पातळीवर तयारी करण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांची ही सभा मास्टर सभा ठरेल, मैदान अपुरे पडले असा दावा, शिवसेनेच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.
“मध्यप्रदेशला OBC आरक्षणाला मान्यता दिली, मग महाराष्ट्राला का नाही?”
तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या सभेआधीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे २३ मे रोजी पाणी प्रश्नावर थेट महापालिकेवर मोर्चा शिवसेनेला घेरणार असल्याची माहिती आहे. यावरून उद्धव ठाकरेंच्या मास्टर सभेअगोदर, देवेंद्र फडणवीस मास्टर स्ट्रोक लगावण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
राऊत- सोमय्या वाद चिघळला; किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांची याचिका कोर्टात दाखल..
भाजपकडून काढण्यात येणाऱ्या जल आक्रोश मोर्चाची जोरदार तयारी कार्यकर्त्यांनी सुरू केली आहे. भाजपचा हा मोर्चा आतापर्यंत काढण्यात येणाऱ्या मोर्चापैकी सर्वात मोठा असेल , अशी माहिती पक्षांच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. ५० हजार नागरिक व भाजपचे कार्यकर्ते या मोर्चात सहभागी होणार आहे. या मोर्च्याच्या नियोजनाची जबाबदारी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड, आमदार अतुल सावे, शहराध्यक्ष संजय केणेकर व स्थानिक पदाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. पाणी प्रश्नावरून शिवसेनेला कोंडीत पकडण्याची ही भाजपाची रणनीती असल्याचे बोलले जात आहे.
“ठाकरे सरकारने ओबीसी आरक्षणाची हत्या केली”; फडणवीसांचा हल्लाबोल
पाणी प्रश्नावरून आक्रमक झालेल्या भाजपला प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेकडून ५० टक्के पाणी कपातीचे अस्त्र वापरण्यात आले आहे. परंतु ते देखील निष्फळ करण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहे. या भव्य मोर्चाच्या माध्यमातून भाजपकडून येत्या महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा हा श्रीगणेशा करण्यात येणार आहे. फडणवीसांच्या उपस्थितीत निघणाऱ्या जल आक्रोश मोर्चात राज्यभरातील भाजपचे नेते सहभागी होण्याची शक्यता आहे. हा मोर्चा दुपारी चार वाजता निघेल. मोर्चानंतर महापालिके समोरच फडणवीसांची तोफ धडाडणार आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Read also:
- राजकीय कट्टर विरोधकांचा लेह दौरा, रवी राणा – संजय राऊतांच्या जेवणायच्या पंगतीत रंगल्या गप्पा
- मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि नेते वसंत मोरेंवर गुन्हा दाखल
- संजय राऊत कोण आहेत? आमच्या लेखी फार महत्त्वाचा माणूस नाही – फडणवीस
- महाविकासआघाडीची नवी रणनीती; राज्यसभेसाठी देखील राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसची महायुती
- “प्रयत्न करणे आपल्या हातात आहे”; OBC आरक्षणाबाबत अजित पवारांंनी दिली मोठी माहिती