पुणे : समाविष्ट २३ गावांच्या विकास आराखड्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या महानगर नियोजन समितीबाबत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेसाठी वकिलांसह येणारा इतर खर्च पुणे महापालिकेने करावा, असा ठराव स्थायी समितीत मंजूर करण्यात आला आहे. या ठरावा विरोधात शिवसेनेने पुणे महापालिकेच्या प्रवेशव्दारासमोर आणि सभागृह नेते गणेश बीडकर यांच्या दालनासमोर भीक मांगो आंदोलन केले.
सत्ताधारी भाजप याहीवेळी आपटणार तोंडावर; जनहित याचिका खर्चाच्या अंमलबजापणीचे अधिकार आयुक्तांकडे
२३ गावांच्या विकास आराखड्या संदर्भात याचिका भाजपने दाखल केली आहे आणि खर्च पुणेकरांचा का? असा सवाल शिवसेनेने उपस्थित करत भिकमांगो आंदोलन केले. राजकीय स्वार्थापोटी दाखल केलेल्या जनहित याचिकेचा खर्च करण्याची भाजपाच्या नगरसेवकांची ऐपत नसल्यामुळे पुणेकर नागरिकांच्या कररूपी पैशातून या याचिकेचा व वकीलांचा खर्च पुणे महापालिकेच्या निधीतून करण्याचा घाट भाजपातील नगरसेवकांचा आहे. यासाठी त्यांनी स्थायी समितीमध्ये यासंदर्भातला ठराव घाईने मंजूर केला आहे, असा आरोप शिवसेनेने केला आहे.
नगरसेवकांची मज्जाच मज्जा; ऐन निवडणुकीच्या तोंडावर रखडलेली कामे मार्गी लागणार
यासंदर्भात बोलताना शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे म्हणाले, “पुणे महानगरपालिकेत सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपच्या स्टॅंडींग कमीटीच्या सदस्यांनी बहूमताच्या जोरावर एक ठराव पारित केला की, PMRDA च्या सदस्यपदी त्यांची नेमणूक व्हावी. राज्य शासनाने स्वत:च्या अखत्यारीत PMRDA चे सदस्य नियुक्त केले. त्यात भाजपचा एकही सदस्य नसल्यामुळे त्यांची घालमेल होत आहे.”
पुणे महापालिकेतल्या भाजपची जनतेच्या पैशांवर फुकट फौजदारी; जनहित याचिका खर्चाला स्थायीची मंजूरी
“त्यामुळे आता भाजपच्या वकिलांसाठी शिवसेनेने भिक गोळा केली आहे. ती आम्ही त्यांना देणार आहोत. त्यांचा हक्क अबाधीत रहावा, त्यांना चांगला वकिल मिळावा म्हणून हि भिक मागण्यात आली आहे. हे पैसे आम्ही आयुक्तांकडे देणार आहोत. त्यांच्या मार्फत ते भाजपला देण्यात येतील.” असं शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे यांनी म्हटलं आहे.
Read Also :
- काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी सोनिया गांधी संवाद साधणार, मुख्यमंत्री ठाकरेही होणार सामील
- देशमुखांच्या कंपन्यांचे अस्तित्व केवळ कागदावरच, ईडीच्या हाती आणखीनही महत्त्वाचे पुरावे
- बेळगाव कारवार सह संयुक्त महाराष्ट्र व्हावाच! अजित पवारांनी केली पंतप्रधान मोदींकडे मागणी
- अशोकराव तुम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्यायचे की नाही ते स्पष्ट सांगा, चंद्रकांत पाटील यांचे आव्हान
- मुंबईतील हॉटेल, मॉल रात्री १० पर्यंत सुरू राहणार?, पालकमंत्र्याची महत्वपुर्ण माहिती