पुणे : भाजप नेते किरीट सोमय्या पुणे दौऱ्यावर आहेत. बजरंग खरमाटे यांच्या संपत्तीची पाहणी केल्यानंतर पुण्यात पत्रकार परिषद घेतली आहे. किरीट सोमय्या यांनी यावेळी शरद पवार, अजित पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, भावना गवळी, छगन भुजबळ अनिल परब यांना लक्ष्य केलं आहे. तर, पत्रकारांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर केलेल्या आरोपबद्दल काय भूमिका आहे, असं विचारलं असता राज्य सरकारनं त्याप्रश्नी कारवाई करावी, असं म्हणत किरीट सोमय्यांनी त्या प्रश्नाला बगल दिली. तर, छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन प्रकरणी दोषमुक्त करण्यात आल्याबद्दल विचारलं असता आगे आगे देखो होता है क्या, असं म्हणत सोमय्या यांनी इशारा दिला.
एकनाथ खडसे सध्या सत्ताधारी गटात असले तरी गुन्हा घडताना ते भाजपमध्ये होते – ED
छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता झाल्यामुळे, सत्य परेशान हो सकता है, पराजित नही, अशी प्रतिक्रीया दिली होती. त्यावर सोमय्या यांनी शायराना अंदाजात उत्तर दिले आहे. पत्रकार परिषद अजित पवार पासून सुरु करायची की शरद पवारांपासून सुरु करायची या संभ्रमात आहे, असंही सोमय्या म्हणाले. पुढच्या आठवड्यात आणखी एक कॅबिनेट मंत्र्यांचे घोटाळे कागदपत्रासह लोकांसमोर आणणार असल्याचं त्यांनी सांगितलं. अजित पवारांमध्ये हिम्मत आहे तर जरंडेश्वर कारखान्याच्या व्हॅल्यूवेशनचे कागद का लोकांसमोर ठेवत नाहीत, असा सवाल सोमय्यांनी केला आहे. 65 कोटीत कारखाना घेतला अन 700 कोटीच बँकेचे कर्ज घेतले, असं सोमय्या म्हणाले. जरंडेश्वरच्या एका व्हॅल्यूअरचं नाव वैभव शिंदे आहे, असंही ते म्हणाले.
शरद पवार उद्धव ठाकरेंच्या भेटीला; कोणत्या मुद्यांवर चर्चां होणार, राजकीय तर्कवितर्कांना उधान
बजरंग खरमाटे आणि अनिल परब संदर्भातील एका याचिकेवर सुनावणी पुढच्या महिन्यात लोकायुक्त समोर आहे. दोन तीन आठवड्यात पहिली कारवाई होणार असल्याचं किरीट सोमय्या म्हणाले.अनिल परब यांचं अनधिकृत रिसॉर्ट पाडण्याचा प्रस्ताव मंजूर झालाय, मग तरी अनिल परब मंत्रिमंडळात कसे काय? असा सवाल सोमय्या यांनी केला आहे.
“नांदेड फक्त झलक, आवाज उठवायचा म्हटलं तर…” संभाजीराजेंचा ठाकरे सरकारला इशारा
शरद पवार सर्टिफिकेट देतात ईडी अतिक्रमण करते, हैराण करते, भावना गवळी निर्दोष आहे. भावना गवळीने 40 वेळा बँकेतून पैसे काढले आहेत. 21 लाखांपेक्षा कमी पैसे काढले नाहीत. रिसोर्स अर्बन क्रेडिट सोसायटीमधून हे पैसे काढले आहेत. अन शरद पवार म्हणतात ईडी का चौकशी करते. शरद पवार आपणच ठाकरे सरकारला मार्गदर्शन करताय का? एकूण 118 कोटींचा घोटाळा आहे. शरद पवारांना भावना गवळींना वाचवायचे असेल तर त्यांनी सांगावं, असं किरीट सोमय्या म्हणाले. तर, शरद पवारांना यासाठी सहकार चळवळ हवी आहे का, असा सवाल सोमय्या यांनी शदर पवारांना केला.
Read Also :
- अजित पवार जरंडेश्वर कारखान्याची कागदपत्रं उघड करण्याची हिंमत का दाखवत नाहीत? – किरीट सोमय्या
- राष्ट्रवादीच्या बैठकीवर आणि मुख्यमंत्री-पवार यांच्या भेटीवर अजित पवार म्हणतात…
- मिशन २०२२ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जम्बो कार्यकारणी जाहिर; विधानसभा मतदार संघनिहाय अध्यक्ष, पदाधिकार्यांची नावे…
- ठाकरे कुटुंबाची मर्जी राखण्यासाठी धडपड, महिलांवरील अत्याचाराबाबत नीलम गोऱ्हे यांचे मौन का?
- राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांकडून महिला सरपंचाला मारहाण; गौरी गायकवाड देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार