मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने, ओबीसी समाजाचं, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिल्यानंतर, ओबीसी आरक्षणाला घेऊन सध्या राज्यात प्रचंड गदारोळ सुरु आहे. यातच, निवडणूक आयोगाकडून धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर या ५ जिल्ह्यांतील ३३ पंचायत समित्या आणि ५ जिल्हा परिषदांच्या रिक्त जागांवर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला गेला आहे.
“डबे कितीही बदललेले तरी काही उपयोग नाही, इंजिन बदलणे गरजेच आहे”
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर, राज्य सरकारने आयोगाला महामारीचे कारण पुढे करून, या निवडणुका न घेण्याची किंवा पुढे ढकलण्याची विनंती केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाकडून आदेश असल्याने, त्याची आम्ही अवहेलना करू शकत नाही, असे सांगत आयोगाने राज्य सरकारला, तुम्हाला निवडणूका नको असतील किंवा पुढे ढकलायचा असतील तर सर्वोच्च न्यायालयात जाऊन आपली करावे लागेल, असे नमूद केले आणि या निवडणूका १९ जुलै रोजीच होतील, असे देखील सांगितले.
“केवळ ५५ आमदारांत मुख्यमंत्री झाला, पिंपरी-चिंचवडचा महापौर ५० नगरसेवकांत होणार नाही?”
यांनतर, राज्य सरकारने न्यायालयात धाव घेऊन, या निवडणूक पुढे दाहकलण्यात याव्यात अशी याचिका दाखल करून मागणी केली. त्यावर, राज्य शासनाशी विचारविनिमय करून योग्य तो निर्णय घ्यावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिले होते. त्यानंतर आता पुन्हा काल, राज्यातील ५ जिल्ह्यांतील ३३ पंचायत समित्या आणि ५ जिल्हा परिषदांच्या रिक्त जागांवर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात अशी विनंती, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी राज्य निवडणूक आयोगाला पत्र पाठवून केली.
“मला आणि कराडांना गोपीनाथ मुंडे यांनीच घडवलं, आम्ही दोघेही मुंडे साहेबांचेच कार्यकर्ते”- फडणवीस
यावर आता निवडणूक आयोगाने राज्य सरकारला मोठा दिलासा दिल आहे. सर्वोच्च न्यायालयाचे ६ जुलै २०२१ रोजीचे आदेश आणि राज्य शासनाची विनंती लक्षात घेऊन, राज्य निवडणूक आयोगाने, निवडणुका आज आहेत, त्याच टप्प्यावर स्थगित केल्या असून, या पोटनिवडणुकांसाठी लागू असलेली आचारसंहितादेखील आजपासून शिथिल करण्यात आली आहे. आता महामारीची परिस्थिती सुधारल्यावर, या पोटनिवडणुकांचे उर्वरित टप्पे पार पडले जातील. त्याबद्दलची भूमिका, राज्य निवडणूक आयोगातर्फे लवकरच जाहीर करण्यात येईल, असे राज्याचे निवडणूक आयुक्त यु.पी.एस.मदान यांनी सांगितले आहे.
Read Also :
- “मुंडे साहेबांना तर शपथही…” आणि गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीने, पंकजा मुंडे झाल्या भावुक
- लातूरमध्ये राष्ट्रवादीने, भाजप-काँग्रेसला दाखवली वेळ; लावले अनेक पदाधिरकारी गळाला
- पक्षात मी-मी चालत नाही, आधी राष्ट्र, पक्ष आणि शेवटी मी; ही भाजपची संस्कृती, पंकजाताईंचा रोख कुणाकडे?
- पुण्यात एकाच तिकिटावर मेट्रो आणि बसने प्रवास करता येणार – देवेंद्र फडणवीस
- प्रकाश आंबेडकर ICU मध्ये, मात्र बायपास सर्जरी यशस्वी, रेखा ठाकूर यांची माहिती