मुंबई : मागच्या दोन वर्षांपासून राज्यभरातील महाविद्यालये, महामारीमुळे विद्यार्थ्यांसाठी बंद आहेत. मात्र, असे असले तरी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या निवडलेल्या अभ्यासक्रमासाठी संपूर्ण शुल्क भरावे लागत आहे. मात्र, महामारीमुळे एकीकडे, महाविद्यालये उपलब्ध करून देत असलेल्या सर्व काही सुविधा बंद असल्याने आणि त्यांचा उपयोग करून घेता येत नसल्याने, अश्या सुविधांसाठीचे शुल्क; जसे की ग्रंथालय, प्रयोगशाळा, क्रीडांगण कमी करावे, अशी मागणी केली जात आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांवर आणि पालकांवर येणारा अवाजवी शुल्काचा भर कमी होईल.
विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसला आमचा पाठिंबा; शिवसेना राष्ट्रावादी काँग्रेसने केला पुनरुच्चार
या पार्श्वभूमीवर आता, राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून, राज्यातील शासकीय व अनुदानित विद्यार्थ्यांना शुल्ककपातीचा दिलासा दिल्यानंतर, राज्य सरकारने पारंपरिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांनाही शुल्ककपातीचा दिलासा दिला आहे. यासाठी आज राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंसमवेत, शिक्षणमंत्र्यांनी बैठक झाली.
मुख्यमंत्र्यांना मिळाला अजून एका मंत्र्याकडून लेटरबॉम्ब, केला काँग्रेस आमदारावर गंभीर आरोप
यावेळी, यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी, विद्यापीठाशी संलग्न अनुदानित आणि विनाअनुदानित महाविद्यालयाच्या शुल्कात सवलत देण्याचे मान्य करण्यात आले असून, मात्र सध्या तरी सवलत किती मिळणार, याचे नियोजन, माहिती आणि सविस्तर आढावा घेऊन मंगळवारी जाहीर करणार येईल, अशी माहिती, उच्च व तंत्र, शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ट्विटर वरून दिली आहे.
तसेच यावेळी, महामारीमुळे ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा मृत्यू झाला आहे, अशा अकृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे संपूर्ण शुल्क माफ करण्याबाबतही विचार झाला आहे. या निर्णयामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. याबाबतचा अंतिम निर्णयही मंगळवारी हाेईल, असेही त्यांनी सांगितले आहे.
Read Also :
- “अनिल देशमुखांना होणार अटक? ईडीला मिळाले सर्व पुरावे” याचिकाकर्त्या वकिलाने केला दावा
- आंदोलकांनी जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांच्या गाड्यांचा ताफा अडवला
- “मंत्री तुडुंब गर्दी जमवतात, मुख्यमंत्री मात्र जनतेला धडे देतात”
- मनसेचा मोठा नेता सायबर क्राईमचा बळी, केले सतर्क राहण्याचे आवाहन
- “होय! मी भक्त आहे! आणि याचा मला अभिमान आहे!”