मुंबई : राज्याच्या राजकारणाचे मंदिर असे समजले जाणारे आणि राज्याचा गाडा जिथून हाकला जातो. त्या मंत्रालयात सर्वसामान्यांना तपासीणी केल्याशिवाय आणि योग्य ओळखपत्र, तसेच पासशिवाय आतमध्ये प्रवेश दिला जात नाही. मात्र त्याच मंत्रालयात घडलेला एक धक्कादायक प्रकार आता उघडकीस आला असून, मंत्रालयात चक्क मोठ्या प्रमाणावर दारूच्या बाटल्या खच सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी नाही? नवाब मलिकांचं मोठं विधान
एबीपी माझा या वृत्तवाहिनीने या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले असून, कॅमेऱ्यात मंत्रालयातील दारूच्या बाटल्यांचा ढिग पडल्याचे दृश्य कैद झाले आहे. विशेष म्हणजे, हा ढीग मंत्रालयातील मुख्य भाग असलेल्या त्रिमूर्तीच्या मागील बाजूस सापडला असल्याने, सुरक्षा यंत्रणांचा एवढा मोठा आणि २४ तास पहारा असूनही एवढया मोठ्या प्रमाणावर दारूच्या बाटल्या मंत्रालयात आल्या कुठून?, आणि यामागे कुणाचा वरदहस्त आहे?, ही दारु रिचवणारे महाभाग नेमके आहेत तरी कोण? असे सवाल उपस्थित होत आहेत.
मोदी सरकारमध्ये राज्यमंत्र्यांना अधिकारच किती? दानवे फक्त बोलघेवडे मंत्री, नवाब मलिकांचा हल्ला
दुसरीकडे, मंत्रालयात उघडकीस आलेल्या या अनागोंदीचा कारभाराचा आता पर्दाफाश झाल्यानंतर, “या प्रकरणाची कसून चौकशी केली जाईल आणि कृत्य करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. ही बाब अत्यंत गंभीर असून, मंत्रालयाची संपूर्ण सुरक्षा व्यवस्था ही पोलीस प्रशासनाकडे असताना हे घडलेच कसे? याचा शोध घेतला जाईल. शेवटी मंत्रालय म्हणजे, सर्व मंत्री, सर्व विभागांचा विषय आह”, अशी प्रतिक्रिया सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.
सहकारी साखर कारखाना घोटाळा प्रकरणात आणखी दोन कारखान्यांचे व्यवहार ईडीच्या रडारवर
दरम्यान, संपूर्ण राज्याचा कारभार ज्या मंत्रालयातून पाहिला जातो. जिथे राज्यातील सर्वसामान्य जनता, आपल्या अडचणी आणि प्रश्न घेऊन, ते सोडवण्यासाठी येत असते. त्यांना या ठिकाणी प्रवेशासाठी कडक सुरक्षा यंत्रणांचा सामना करावा लागतो. त्यांची चौकशी केली जाते, पण अशी सुरक्षा यंत्रणा भेदून, संपूर्ण मंत्रालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असतानाही, या दारुच्या बाटल्या आत आल्याच कशा? आणि याची माहिती कोणालाच कशी नाही? असेही सवाल निर्माण होत आहेत.
Read Also :
- चांगल्या कामांमुळेच आमदारांच्या पायाखालची वाळू सरकली, चंद्रपूर मनपाच्या महापौर राखी कंचर्लावार यांची टीका
- पेगाससने नाही तर मग देशात येऊन कुणी हेरगिरी केली?; नवाब मलिक यांच्या केंद्र सरकारला सवाल
- कसा मिळणार लोकल प्रवासाचा पास? महापौरांनी केली महत्त्वपूर्ण घोषणा!
- केंद्राने खाऊचा डबा दिला, पण डबा रिकामाच आहे, घटना दुरुस्ती विधेयकावरून राऊतांची खोचक टीका
- शिवसेनेचे शिवाजी पार्कसोबत खास नाते, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्यादांच आमदार निधीतून करणार सुशोभिकरण