औरंगाबाद : शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत आज मोठा भूकंप झाला. मनसेच्या 53 कार्यकर्त्यांनी एकाच वेळी राजीनामा दिला आहे. बुधवारी मनसेच्या वरिष्ठ नेत्यांनी चार कार्यकर्त्यांची हकालपट्टी केल्यानंतर अचानकपणे इतरही कार्यकर्त्यांनी राजीनामा देण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार आज गुरुवारी औरंगाबाद मनसेतून 53 कार्यकर्ते बाहेर पडले आहेत. स्थानिक गटबाजीमुळे औरंगाबादमधील मनसेत आधीच एकजूट पहायला मिळाली नव्हती. त्यातच गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या कारवायांमुळे हा पक्ष अधिकच ढेपाळताना दिसतोय.
फडणवीसांच्या मनात ‘ती’ सल असल्यामुळेच मला माफी मागायला लावली – भास्कर जाधव
गुरुवारी 23 डिसेंबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील 53 कार्यकर्त्यांनी एकाच दिवशी राजीनामा दिला. यामुळे पक्षाला मोठे भगदाड पडले आहे. यापूर्वी बुधवारी पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सुहास दाशरथे गटातील चार कार्त्यकर्त्यांची पक्षातून हकालपट्टी झाल्याचे पत्र दिले होते. हे कार्यकर्ते स्थानिक माध्यमे आणि समाज माध्यमांवर पक्षाची आणि पदाधिकाऱ्यांची बदनामी करत असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यामुळे यापुढे या कार्यकर्त्यांचा आणि पक्षाचा काहीही संबंध नाही, असे पक्षाने त्या पत्रातून जाहीर केले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी 53 कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम ठोकल्यामुळे मनसेचे बळ खच्ची होत असल्याची स्थिती आहे.
…तर महाराष्ट्रातील शाळा पुन्हा बंद होणार; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच मोठं वक्तव्य
14 डिसेंबर रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा औरंगाबाद दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्यात मराठवाड्यातील सर्व मनसे पदाधिकाऱ्यांची मोठी बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यातील पक्ष कार्यकारिणीत राज ठाकरेंनी मोठे बदल केले. दोन वर्षांपूर्वी शिवसेनेतून मनसेत आलेल्या सुहास दाशरथे यांच्याकडील जिल्हाध्यक्ष पद काढून घेतले आणि हे पद सुमित खांबेकर यांच्याकडे दिले. त्यामुळे सुहास दाशरथे प्रचंड नाराज होते. माझं, असं काय चुकलं? असा सवाल त्यांनी राज ठाकरे यांना केला होता. त्यानंतर सुहास दाशरथे गटातील कार्यकर्ते पक्षाची बदनामी करत आहेत, असा ठपका ठेवत चार कार्यकर्त्यांना मनसेनं घरचा रस्ता दाखवला.
Read also:
- कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी होऊन प्रचाराला सुरुवात; जिल्हा बँकेसाठी दिग्ग्ज नेत्यांचा कस लागणार
- फडणवीसांनी मागतिलेला ‘१५ लाखांचा’ पुरावा सत्यजित तांबेनी दिला; मोदींचा ‘तो’ व्हिडीओच समोर आणला
- माजी मंत्री अनिल राठोडांच्या पुत्रास विधानसभेच्या उमेदवारीवरून जीवे मारण्याची धमकी; अहमदनगर शहरात खळबळ
- “हे सरकार घाबरलेलं…”; विधानसभा अध्यक्ष निवड प्रक्रियेवरुन फडणवीसांचा घणाघात
- पुणे जिल्हा बॅंक निवडणुकीमध्ये दत्तात्रय भरणे आणि जगदाळे बिनविरोध..!