नवी दिल्ली : महाविकास आघडी सरकार सत्तेत आल्यापासून राज्याच्या राजकारणात अनेक प्रकारच्या घडामोडी सातत्याने घडत आहेत. एकीकडे विरोधी पक्ष बदला घेण्याच्या हेतूने आक्रमक होऊन, महाविकास आघाडी सरकरावर सातत्याने हल्लाबोल करत आहे. त्यासाठी छोट्यातली छोटी संधी देखील भाजप सोडत नाहीये.
दुसरीकडे महाविकास आघाडीत सारं काही आलबेल सुरू असल्याचं सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, आत्तापर्यंत ठाकरे सरकारमधल्या कुरबुरीच्या अनेक छोट्या-मोठ्या घटना समोर आल्या असून, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या स्वबळाच्या घोषणेनंतर आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यावर केलेल्या फोन टॅपिंगच्या आरोपनंतर मात्र, काँग्रेस आणि महाविकास आघडीत नाराजीनाट्य आणि नाट्यमय घडामोडींना वेग आला आहे.
आरक्षण मिळवून न देण्यामागे ‘या’ नेत्यांचा हात, भाजपने उघड केली झारीतील शुक्राचार्यांची नावे
या पार्श्वभूमीवर आधी नाराज शरद पवारांची काँग्रेस नेत्यांनी भेट घेऊन त्यांची समजूत घालून दिल्यानंतर, काँग्रेस नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात आणि मंत्री नितीन राऊत यांनी दिल्लीत जाऊन आधी काँग्रेस पक्षश्रेष्ठींची भेट घेतली होती. यांनतर आता राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर आणि नाना पटोले यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींची भेट घेतली आहे.
धक्कादायक! मोदी सरकारचा देशाच्या सुरक्षेशी खेळ? विरोधकांनी केला हेरगिरीचा भांडाफोड
यानंतर, आता एक मोठी बातमी काँग्रेसच्या गोटातून येत असून, नाना पटोलेंच्या राज्यात दिलेल्या स्वबळाच्या नाऱ्याला, काँग्रेस हाय कमांडकडून होकार दिला गेला आहे. महाविकास आघाडीतून बाहेर पडून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका काँग्रेस पक्ष लढणार असण्यावर यामुळे आता शिक्कामोर्तब झाले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राज्य प्रभारी एस.के. पाटील आज दुपारी राहुल गांधी यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. त्यांच्यात दीड तास बैठक झाली. यानंतर हा मोठा निर्णय घेतला आहे.
Read Also :
- पुण्याचे खरे शिल्पकार कोण? बॅनरबाजीच्या लढाईत भाजप-राष्ट्रवादीने शहराला हरताळ फासले
- “विरोधकांकडून भारतीय लोकशाहीला बदनाम करण्याचा कट”, पिगॅसस प्रोजेक्टवरून फडणवीसांचा गंभीर आरोप
- मोदींच्या काळात फोन टॅप झाले नाही, मनमोहन सिंगांच्या काळात झाले – फडणवीसांचा दावा
- संसदीय समितीच्या बैठकीत मोदींनी उठवले, काँग्रेसच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह, म्हणाले…
- मुंबई विमानतळाचे मुख्यालय अहमदाबादला हलवलं; अदानींचा मोठा निर्णय