नवी दिल्ली : कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना मंगळवारी राज्यातील शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली आहे. केंद्राने पूरग्रस्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी जवळपास ७०० कोटी मंजूर केले असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी दिली. राज्यात काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांनी पातळी ओलांडल्याने पूरस्थिती निर्माण झाली होती. याचा फटका हा राज्यातील शेतीलाही बसला आहे. पुराचे शेतात घुसल्याने प्रवाहाच्या वेगात ही पिकेही वाहून गेली आहेत तर काही ठिकाणी पाणी साचून राहिल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
कोल्हापूरात पावसाच्या पाण्यानंतर आता पिण्याच्या पाण्याचे संकट; पुणे महापालिकेची मदतीसाठी धाव
दरम्यान,विरोधी पक्षाच्या सदस्यांनी पाचव्या दिवशीसुद्धा सभागृहात गोंधळ घातल्याने कामकाज थांबवावे लागले होते. सभापती ओम बिर्ला यांनी विरोधकांना वारंवार कार्यवाहीत सहभागी होण्याचे आवाहन केले पण प्रश्नोत्तराचा तास अनेक वेळा तहकूब करावा लागला. त्यानंतर पुन्हा ४ वाजता सभागृहाचे कामकाज सुरु करण्यात आलं.
सांगलीतील भिलवडी बाजारपेठेचे अजित पवारांकडून बोटीतून पाहणी; खराब वातावरणामुळे कोल्हापूर दौरा रद्द
सभापतींनी मध्यस्थी करण्यास भाग पाडले म्हणून विरोधकांनी आंदोलन सुरू केले. “कृपया आपल्या जागांवर परत या आणि कामकाजात भाग घ्या. आपण सरकारला आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे विचारू शकता. कृपया सहकार्य करा,” अशी बिर्ला वारंवार विनंत्या करत होते.
खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांचा सातारा दौरा रद्द! मात्र ‘पुन्हा येईन’चे दिले आश्वासन
गोंधळाच्या परिस्थितीत तोमर यांनी महाराष्ट्रात आलेल्या पुराबद्दल भाष्य केले. ज्यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला आणि हजारो कुटुंबांचे नुकसान झाले आहे. “आम्हाला नुकत्याच आलेल्या पूरामुळे, विशेषत: शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा सखोल अहवाल मिळाला आणि त्याचे विश्लेषण केले आहे. गृह मंत्रालयाने ७०० कोटीं रुपये मदत म्हणून मंजूर केले आहे, ” असे तोमर म्हणाले.
Read Also :
- पूरग्रस्त भागाशी संबंध नसलेल्या नेत्यांना, पवारांनी केले कळकळीचे आवाहन
- सोशल मीडियाचा कमी वापर अन् निवडणुकीच्या तयारीला लागा; राज ठाकरेंनी टोचले कान
- “या परिस्थितीत महाराष्ट्रात आलात तर…”, संजय राऊतांनी केंद्रातल्या मराठी मंत्र्यांना दिले आव्हान!
- दोन दिवसात पूरग्रस्तांना अडीच कोटींच्या साहित्याचं वाटप करणार; शरद पवारांची घोषणा
- ‘जनता समोर येऊन राग व्यक्त करू लागल्याने शिवसेना हादरलीय’, नारायण राणे यांची टीका