नवी दिल्ली : पेगासस प्रकरणावरून संसदेत आज प्रचंड गदारोळ झाला. विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात हे प्रकरण लावून धरले आहे. काही गोंधळी सदस्यांनी थेट लोकसभा अध्यक्षांवर आणि मीडिया गॅलरीच्या दिशेने कागद फेकले. संसदेत जोरजोरात घोषणाबाजी केली. त्यामुळे सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं. वारंवार संसदेचं कामकाज तहकूब करावं लागत असल्याने १० गोंधळी खासदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव सरकारकडून आणण्याची शक्यता आहे.
कोकणसाठी कटू निर्णय घेण्याची गरज, ६ जिल्ह्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान
आज सकाळपासूनच विरोधकांनी राज्यसभा आणि लोकसभेत पेगासस प्रकरणावरून गोंधळ घातला. पेगासस प्रकरणावर चर्चा घडवून आणण्याची विरोधकांची मागणी आहे. तर सरकारने ही चर्चा फेटाळून लावली आहे. त्यामुळे दोन्ही सभागृहात विरोधकांनी गोंधळ घातल्याने दोनदा दोन्ही सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं. लोकसभेत तर विरोधकांनी वेलमध्ये उतरून थेट लोकसभा अध्यक्षांच्या दिशेने कागद फेकले. काही सदस्यांनी मीडिया गॅलरीच्या दिशेने कागदं उधळून जोरदार घोषणा दिल्या. त्यामुळे सभागृहात एकच गदारोळ झाल्याने कामकाज ४ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं. तर राज्यसभेचं कामकाज उद्या गुरुवार ११ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे.
मोदी सरकारला देशाची तरुणाई २०२४ मध्ये उलथवून लावेल!
दरम्यान, सभागृहात खासदारांकडून रोज गोंधळ घातला जात आहे. त्यामुळे संसदेच्या कामकाजात व्यत्यय येत आहे. आज सकाळी तर काही सदस्यांनी थेट अध्यक्षांवरच कागदांची उधळण केली. त्यामुळे या सदस्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येण्याची शक्यता आहे. सुमारे १० खासदारांना निलंबित केलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Read Also :
- भाजपाला सत्तेपासून रोखण्यसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने केले देशपातळीवर प्रयत्न सुरु
- मिशन यूपी इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार देशभरातील ओबीसी विद्यार्थ्यांना देणार मोठा दिलासा
- मोदी सरकारला देशाची तरुणाई २०२४ मध्ये उलथवून लावेल!
- कोकणसाठी कटू निर्णय घेण्याची गरज, ६ जिल्ह्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान
- राज्यपाल कोश्यारींकडून ठाकरे सरकारचे कौतुक, महापुराच्या संकटात उत्तम कामगिरी