नवी दिल्ली : संसदेचे यंदाचे पावसाळी अधिवेशन १९ जुलैपासून सुरू होणार असून, १३ ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. यामध्ये १९ कामकाजाचे दिवस असणार आहेत. अशी माहिती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिली आहे.
तांदूळ घोटाळ्याचे धागेदोरे वरपर्यंत; फडणवीसांचा गंभीर आरोप
संसदीय कामकाज मंत्रिमंडळाच्या समितीने १९ जुलै ते १३ ऑगस्ट दरम्यान संसदेचे पावसाळी अधिवेशन घेण्याची शिफारस केली होती. या अधिवेशनात, सरकार अनेक बिलं सादर करु शकते. या दरम्यान, करोना आणि कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आंदोलनाचा मुद्दा विरोधक उपस्थित करू शकतात.
“महाविकास आघाडी सरकार त्याचा कार्यकाळ पूर्ण करील’’, काँग्रेसच्या बड्या नेत्याचे वक्तव्य
अधिवेशनात कोविडशी संबंधित सर्व प्रोटोकॉलचे पालन केले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. संसदेत प्रवेश करणाऱ्या सर्वांनी करोना लसीचा किमान एक डोस घेतला असेल, हे तपासल्या जाणार आहे.
The Monsoon Session of Parliament will take place from July 19 to August 13. Will have 19 business days: Lok Sabha Speaker Om Birla pic.twitter.com/fA5fCvSrEe
— ANI (@ANI) July 12, 2021
सरकार अनेक बिलं सादर करु शकते
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात अनेक महत्वाचे मुद्दे मांडले गेले. संसदीय कामकाज मंत्रिमंडळाच्या समितीने १९ जुलै ते १३ ऑगस्ट दरम्यान संसदेचे पावसाळी अधिवेशन घेण्याची शिफारस केली होती. या अधिवेशनात, सरकार अनेक बिलं सादर करु शकते. या दरम्यान, करोना आणि कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आंदोलनाचा मुद्दा विरोधक उपस्थित करू शकतात. अधिवेशनात कोविडशी संबंधित सर्व प्रोटोकॉलचे पालन केले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. संसदेत प्रवेश करणाऱ्या सर्वांनी करोना लसीचा किमान एक डोस घेतला असेल, हे तपासल्या जाणार आहे.
राजकारणात सर्वकाही सोयीनुसार घडते ; मोदी सरकारच्या नव्या सहकारमंत्र्यांचे शिवसेनेकडून स्वागत
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा कालावधी दोन दिवसांचाच असला तरीही या अधिवेशनात जनतेच्या हिताचे आणि महत्वपूर्ण कामकाज करता आले याचे समाधान आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळ अधिवेशन समारोप झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. या अधिवेशनात ९ विधेयके दोन्ही सभागृहांनी मंजूर केली. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, संसदीय कार्य मंत्री अनिल परब, राज्यमंत्री संजय बनसोडे उपस्थित होते.
Read Also :
- “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महामारी काळात देशात सर्वात उत्तम काम केलं आहे.”
- एकनाथ खडसे कधी सीडी लावताहेत याची वाट पाहतोय – राज ठाकरे
- ‘नॉट रिचेबल’ असणाऱ्या नारायण राणेंचा अखेर फोन लागला; राज ठाकरेंनी मंत्रिपदासाठी दिल्या शुभेच्छा
- कोल्हापूर जिल्हा परिषद: पुत्रप्रेम जिंकणार की, एक कार्यकर्ता अध्यक्ष होणार?
- जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे; रामदास आठवलेंची मोठी मागणी