नवी दिल्ली : टोकियो ऑल्मपिकच्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. ऑल्मपिकमध्ये अनेक भारतीय खेळाडू देशाचं नाव उंचावत पदकं पटकावत आहेत. यातच केंद्र सरकारने खेलरत्न पुरस्कारचं नाव बदलण्याचं ठरवलं आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं करण्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे.
मुंबईतील लोकल ट्रेनसाठी आंदोलन करणाऱ्या प्रवीण दरेकर यांच्यावर दंडाची कारवाई
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. पंतप्रधान म्हणाले की, मला संपूर्ण भारतातील नागरिकांकडून खेलरत्न पुरस्काराचं नाव मेजर ध्यानचंद ठेवण्याबाबत आग्रह केला जात होता. लोकांच्या या भावनेचा सन्मान राखत खेलरत्न पुरस्काराचं नाव मेजर ध्यानचंद पुरस्कारने यापुढे ओळखलं जाईल असं त्यांनी सांगितले.
I have been getting many requests from citizens across India to name the Khel Ratna Award after Major Dhyan Chand. I thank them for their views.
Respecting their sentiment, the Khel Ratna Award will hereby be called the Major Dhyan Chand Khel Ratna Award!
Jai Hind! pic.twitter.com/zbStlMNHdq
— Narendra Modi (@narendramodi) August 6, 2021
तसेच ऑल्मपिक खेळांमध्ये भारतीय खेळाडूंची शानदार कामगिरी आपल्या सर्वांना ज्ञात आहे. विशेषत: हॉकीमध्ये आपल्या पुरुष-महिला खेळाडूंनी जी इच्छाशक्ती दाखवली. विजयासाठी जी जिद्द दाखवली ती वर्तमान काळात आणि येणाऱ्या पिढीसाठी खूप मोठी प्रेरणा देणारी आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
ओलंपिक खेलों में भारतीय खिलाड़ियों के शानदार प्रयासों से हम सभी अभिभूत हैं। विशेषकर हॉकी में हमारे बेटे-बेटियों ने जो इच्छाशक्ति दिखाई है, जीत के प्रति जो ललक दिखाई है, वो वर्तमान और आने वाली पीढ़ियों के लिए बहुत बड़ी प्रेरणा है।
— Narendra Modi (@narendramodi) August 6, 2021
या पुरस्काराची सुरुवात १९९१-९२ मध्ये झाली होती. तेव्हा या पुरस्काराचं नाव देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर नावावर ठेवलं होतं. क्रिडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारानं गौरवण्यात येत होते. खेळाडूंना सन्मानित करून त्यांची प्रतिष्ठा वाढवणे. समाजात अशा खेळाडूंना प्रतिमा उंचावणे यासाठी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार दिला जात होता. मात्र आता या पुरस्काराचं नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार म्हणून ओळखला जाईल.
Read Also :
- मनसे नेत्याची मोठी प्रतिक्रिया, “मनसे आणि भाजप एकत्र आले तर आनंदच!”
- पेगासस हेरगिरी प्रकरण: होत असलेले आरोप गंभीर, सत्य बाहेर यायला हवं – सर्वोच्च न्यायालय
- सेनेसाठी विदर्भात धोक्याची घंटा, वर्षभरात तिघांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
- केंद्र सरकार लोकशाहीचे चारही स्तंभ मोडीत काढायला निघाले; संजय राऊतांची घणाघाती टीका
- मुंबईच काय घेऊन बसलात, पूरस्थिती जगभर निर्माण होतेय, तेथे महापालिका आमच्या ताब्यात आहे का?