मुंबई : ठाकरे सरकाराच्या मंत्र्यांची पोलखोल करणारे भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या सुरक्षेत आता वाढ करण्यात आली असून, त्यांना मोदी सरकारने थेट झेड दर्जाची सुरक्षा पुरवली आहे. त्यामुळे आता त्यांच्याभोवती तब्बल सशस्त्र अश्या ४० CISF जवानांच्या सुरक्षेचं कड असणार आहे. ठाकरे सरकारमधल्या मंत्र्यांची गैरव्यवहारांची प्रकरणे बाहेर काढायला लागल्यानंतर सोमय्यां यांना धमक्या येऊ लागल्या होत्या. या पार्श्वभूमीवर केंद्राकडून त्यांना ही सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने कंबर कसली; देवेंद्र फडणवीसांवर पक्षाने सोपवली मोठी जबाबदारी
शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्यावर भष्ट्राचाराचे आरोप केल्यानंतर, त्यांच्या वाशिम मधल्या साखर कारखान्यायाला भेट देतेवेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली होती. यावेळी त्यांच्या वाहनावरही शाही फेकण्यात आली होती. त्यांनतर त्यांच्या सुरक्षेत वाढ केली गेली आहे. दरम्यान, सोमैयांनी प्रताप सरनाईक, अनिल परब, मिलिंद नार्वेकर, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, भावना गवळी व छगन भुजबळ यांच्यास अनेक नेत्यांवर विविध आरोप केलेले आहेत.
भावना गवळींच्या ट्रस्टशी संबंधित दोघांना ईडीचे समन्स; मागितली १५ दिवसांची वेळ
तसेच, मुख्यमंत्र्यांनीही सत्तेत आल्या आल्याच ९०० कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. सोबतच मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंवरही १९ बेनामी बंगले असल्याचा आरोप करत त्यांनी ठाकरे सरकारचे हे ‘अकरा घोटाळेबाज’ अशी एक यादी जाहीर केली होती. ज्यात अनेक कॅबिनेट मंत्र्यांचा आणि नेत्यांचा समावेश होता. दरम्यान, आज त्यांनी ठाणे महापालिका आयुक्तांची भेट घेतली. यावेळी, अनिल परब व प्रताप सरनाईक यांच्या अनधिकृत बांधकामवर कारवाई होणार,” असं सांगितलं.
भाजप खासदाराच्या सुनेचे कुटुंबियांवर गंभीर आरोप, राष्ट्रवादीकडे केली मदतीची मागणी
“माझ्यामुळे काही मंत्र्यांची झोप उडाली असून, ते भाई लोकांची मदत घेत आहेत. ठाकरे सरकारला ठिकाण्यावर आणण्याचे काम मी करत आहे. वाशीममध्ये माझ्यावर जो हल्ला झाला, त्यात भावना गवळींचे काही भाई लोक होते. असं रिपोर्टमध्येही समोर आलं आहे. या सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांपासून अनेक जण घोटाळेबाज आहेत. स्वतः मुख्यमंत्र्यांचेच गुंड मला गोळ्या झाडण्याच्या धमक्या देत आहेत,” असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
Read Also :
- ‘या’ अधिकाऱ्यावर होती हिरेनच्या हत्येची जबाबदरी, NIA च्या आरोपपत्रात मोठा खुलासा
- पेडणेकर, जाधव, कांबळे, धोत्रे, पाटील हे मराठी नाहीयेत का?; गोपीचंद पडळकरांचा सवाल
- सुनेच्या गंभीर आरोपानंतर भाजपचे खासदार रामदास तडस यांनी दिली पहिली प्रतिक्रिया
- राज्यात पुन्हा कडक निर्बंध लागणार का? विजय वडेट्टीवारांचं दिलं स्पष्टीकरण
- चंद्रकांत पाटलांनी महापालिका निवडणुकीचा शड्डू ठोकला; एकाच वेळी एक लाख कार्यकर्त्यांशी संवाद