मुंबई : महाराष्ट्रात राज्यसभेच्या निवडणुकीत सहाव्या जागेसाठी चांगलीच मोर्चेबांधणी सुरु आहे. अपक्ष आमदार कुणाला मतदान करणार यावरून सत्ताधारी व विरोधकात नानाविध तर्कवितर्क लावले जात आहे. या संदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक मोठे विधान केले आहे.
खंडोबाची शप्पत घेवून सांगतो, फडणवीस यांनीच…
राज्यसभेच्या निवडणुकीला अवघे काही दिवस उरले आहेत. सहावा उमेदवार कोणत्या पक्षाचा निवडून येणार यात मोठी चुरस निर्माण झाली आहे. सहावा उमेदवार निवडून आणण्यासाठी दोन्ही पक्षांची मदार अपक्ष आमदारांवर आहे. मात्र,ज्याप्रमाणे पक्षाच्या आमदारांना मतदानासाठी जसा व्हीप लागू होतो तसा व्हीप अपक्षांना लागू होत नाही. शिवाय अपक्ष आमदार मतदान करण्यास कुणालाही बांधील राहत नाही. तसेच मतदान करतांना पक्षाच्या आमदारांना पोलिंग एजंटला आपली मते दाखवावी लागतात. तसले बंधन अपक्ष आमदारांना नसते. त्यांनी जर आपली मते कुणाला दिली म्हणून दाखवली तर ते बाद होतात. त्यामुळे अपक्ष डाव टाकणार की डाव साधणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
“गांधींच्या भारताला विकृत अवस्थेतून बाहेर काढावा लागेल”; काॅंग्रेसच नेत्याचं वक्तव्य
अपक्षांना कोणालाही मत दाखवता येत नाही. त्यांनी जर मत कुणाला दाखविले तर त्यांचे मत बाद ठरविले जाते. त्यमुळे राज्यसभेच्या या निवडणुकीत फटका नक्की कुणाला बसेल ते निवडणुकीत कळेलच. असे राज्यसभेच्या निवडणुकी संदर्भात बोलताना पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
Read also:
- आमदार लक्ष्मण जगतापांची रूग्णालयातून घरात जोरात एन्ट्री, विरोधक मात्र कोमात
- राज्यसभेसाठी भाजपचे पारडे जड; भाजपच्या गळाला आणखी तीन आमदार..!
- “साकीनाका बलात्कार प्रकरणाच्या निकालामुळे न्यायव्यवस्थेवरील विश्वास दृढ होईल”; गृहमंत्री
- “छगन भुजबळ OBC आरक्षणावरून तोंडघशी पडतील; आघाडीच्या एका गटाला आरक्षण नकोय”
- भाजपचा ‘जल आक्रोश’ अखेर मुख्यमंत्र्यांनी ऐकला, औरंगाबादचा पाणी प्रश्न सुटणार..