राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. शरद पवार यांच्या मातोश्री भेटीवरून भाजपच्या एका नेत्याने मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. भाजपचे नेते आणि आमदार ॲड. आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
“कुणाला किती वेळा, कुठे भेटावे? हा विषय त्यांचा असला तरी… आपण ज्या व्यक्तीला वारंवार बोलावून घेतो किंवा यायला लावतो… त्या व्यक्तीचे ज्येष्ठत्व, कर्तृत्व, सामाजिक स्थान आणि त्या व्यक्तीच्या प्रकृतीची काळजी याचे भान ठेवावेच लागते! इथे याबाबत ‘आनंदीआनंदच’ आहे!” असे ट्विट शेलार यांनी केले आहे.
कुणाला किती वेळा, कुठे भेटावे?हा विषय त्यांचा असला तरी…
आपण ज्या व्यक्तीला वारंवार बोलावून घेतो किंवा यायला लावतो…त्या व्यक्तीचे ज्येष्ठत्व, कर्तुत्व, सामाजिक स्थान आणि त्या व्यक्तीच्या प्रकृतीची काळजी याचे भान ठेवावेच लागते!
इथे याबाबत "आनंदीआनंदच" आहे!— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 8, 2020
दरम्यान, मुंबईतील १० पोलीस उपयुक्त्यांच्या बदल्या आणि पारनेर सारख्या मुद्यांवरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या अंतर्गत मतभेद चालू होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी मध्यस्थी करून हे गैरसमज दूर केले आहेत. तसेच पारनेरच्या त्या पाच नगरसेवकांची देखील आज घरवापसी झाली आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षातील मतभेद बहुदा संपुष्टात आले असल्याचे चित्र आहे.