मुंबई : देशात लसीकरण मोहिमेचे तीन तेरा वाजले आहेत. लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरण मोहीमेत अनेक अडथळे येत आहेत. देशभरात लसींचा तुटवडा अनेक राज्यांमध्ये जाणवत असून, यावरून केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये खडाजंगी सुरु आहे. या पार्श्ववभूमीवर मंगळवारी केद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी, “देशातील बाकी लस बनवणाऱ्या कंपन्यांना देखील महामारीवरील प्रतिबंधात्मक लस बनवण्याचा परवाना दिला जाण्याची गरज असल्याचं मत मांडलं.
दरम्यान, यानंतर त्यांनी, “केंद्राने आधीच यासंबंधी निर्णय घेतला होता, आपल्यालाच याची कल्पना नव्हती अशी कबुली दिली आहे. यासंदर्भांत त्यांनी एक ट्विट केलं असून, “काल स्वदेशी जागरण मंचातर्फे आयोजित केलेल्या परिषदेत, मी सरकारला लसनिर्मिती वाढवण्याचा सल्ला दिला होता. मात्र, या माझ्या या भाषणाआधीच केंद्रीय रसयान आणि खत राज्यमंत्री मनसुख मांडविया यांनी लसनिर्मिती वाढवण्यासाठी सरकारकडून चालू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली होती, याची मला कल्पना नव्हती,” असं स्पष्टीकरण नितीन गडकरी यांनी दिलं आहे.
Yesterday while participating at the conference organised by Swadeshi Jagaran Manch, I had made a suggestion to ramp up vaccine production. I was unaware that before my speech Minister for Chemical & Fertilizers Shri @mansukhmandviya had explained government’s efforts to ramp up
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) May 19, 2021
“परिषदेनंतर त्यांनी मला केंद्र सरकार १२ वेगवेगळ्या कंपन्यांकडून लसनिर्मिती करून घेत असून, या प्रयत्नांमुळे भविष्यात लसनिर्मिती वाढण्याची अपेक्षा आहे, असं देखील त्यांनी सांगितलं”, असंही नितीन गडकरींनी स्पष्ट केलं.
…vaccine production.
After conference, he also informed me that, GoI is already facilitating vaccine manufacturing by 12 different plants/companies and rapid ramp up of production is expected in near future as a result of these efforts.
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) May 19, 2021
“माझ्या सल्ल्याआधीच त्यांच्या मंत्रालयाने हे प्रयत्न सुरु केले आहेत, मी याची कल्पना नव्हती. मंत्रालय योग्य दिशेने जात असल्याबद्दल मला आनंद असून, मी त्यांचं अभिनंदन करतो. हे रेकॉर्डवर ठेवणं मला महत्वाचं वाटतं,” हे देखील नितीन गडकरी यांनी मनमोकळेपणाने मान्य केलं.
I was unaware that his ministry has started these efforts before I had given suggestion yesterday. I am glad and congratulate he and his team for this timely intervention in the right direction. I feel important to put this on record.
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) May 19, 2021
दरम्यान त्यांनी या मंचावरून, “बिहार-उ.प्रदेशात अंत्यसंस्कारासाठी जास्त पैसे मोजावे लागत असल्याने, नागरिकांकडून मृतदेह गंगेत सोडण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर आणि देशभरातून यावर अनेक सवाल उपस्थित केले गेल्यानंतर, सर्व तक्रारींची दखल घेऊन, “चंदनाऐवजी डिझेल, इथेनॉल आणि बायोगॅस आणि विजेचा वापर केला गेल्यास, अंत्यसंस्कार करणे स्वस्त होईल”, त्यामुळे या संबंधीचा प्रस्ताव केंद्राकडे मांडला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
Read Also :
- “माझे पती मंत्री आहेत, त्यांच्याकडे एवढी संपत्ती असताना त्यांना आमदार निवासाची गरज काय?” करूणा धनंजय मुंडे
- चंद्रकांत पाटलांनी ज्योतिष सांगण्याचा नवा व्यवसाय उघडला – संजय राऊत
- “पंतप्रधान मोदी साहेब, आशा आहे सकारात्मक पाऊल उचलले जाईल”; खत भाव वाढीवरून प्रीतम मुंडेंचे पत्र
- मोठी बातमी! पदोन्नतीत आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला राज्य सरकारकडून तूर्त स्थगिती
- पंतप्रधानांच्या कृतीचा हाच अर्थ, उद्धव ठाकरे कोणत्याही संकटाचा “सामाना” करण्यास समर्थ!