पुणे – आज म्हणजे ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत 16 व्या शतकात बांधण्यात आलेली बाबरी मशीद पाडण्यात आली होती. त्यानंतर देशभर उसळलेल्या दंगलीत सुमारे दोन हजार जणांचा मृत्यू झाला होता. याबाबत शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी टि्वट केलं आहे. त्यानंतर भाजप नेत्यांनी त्यांच्यावर निशाणा साधण्यास सुरवात केली आहे.
— Milind Narvekar (@NarvekarMilind_) December 6, 2021
बाबरी मशिद पाडतानाचा एक फोटो नार्वेकर टि्वट केला आहे. अयोध्येतील राम मंदिर निर्माणासाठी बलिदान दिलेल्या शिवसैनिकांना त्यांनी नमन केलं आहे. पण या टि्वटमुळे ते भाजपच्या निशाण्यावर आले आहे. भाजपचे नेते नारायण राणे, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नार्वेकरांचा समाचार घेतला आहे. ते माध्यमांशी बोलत होते. नार्वेकरांनी केलेल ट्विट हे महाविकास आघाडीच्या पायाला सुरुंग लावणारे असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
पुणे जिल्हा बँकेच्या रिंगणात तिसऱ्या मंत्र्यांची एन्ट्री; वळसे-पाटलांचा देखील अर्ज दाखल
‘नार्वेकरांनी असं टि्वट करणं हे महाविकास आघाडीच्या पायाला सुरुंग लावणं आहे. महाविकास आघाडी धर्मनिरपेक्ष यावरच आहे ना ? अल्पसंख्यांकांचे लांगुलचालन यावर तो मिनार उभा आहे. त्यांचे मातोश्रीशी काही बिनसलं का कळत नाही. कारण असं ट्विट करणं त्यांच्या पायाला सुरुंग लावण्यासारखे आहे,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, ”मिलिंद नार्वेकर यांनी अशा प्रकारचे टि्वट केल्यानं त्यांचे अन् ‘मातोश्री’याच्यात काही बिनसलं आहे का, अशी शंका येते. नार्वेकर यांनी आघाडी सरकारच्या मनोऱ्यालाच धक्का लावला आहे,”
दरम्यान, २९ वर्षांपूर्वी आजच्या (६ डिसेंबर) बाबरी विध्वंसाची वादग्रस्त इमारत कारसेवकांच्या जमावाने उद्ध्वस्त केली होती. अयोध्येच्या इतिहासात ६ डिसेंबर ही एक अशी तारीख म्हणून नोंदली गेली आहे, ज्याचे विविध संदर्भ आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने हजारो शिवसैनिक बाबरी मस्जिद पाडण्यासाठी गेले होते. यावेळी झालेल्या गोळीबारात असंख्य कारसेवकांसोबत शिवसैनिकांचा मृत्यू झाला होता. त्याचीच आठवण म्हणून मिलिंद नार्वेकर यांनी टि्वट करीत या घटनेत बलिदान देणाऱ्या शिवसैनिकांना अभिवादन केलं आहे.
Read Also :
- खडसे vs महाजन; आगामी निवडणुकीत भाजपचे वर्चस्व राखण्याचे महाजनांपुढे आव्हान
- भाजप नगरसेवकांची सहल, हा आचारसंहिता भंग नाही का?; काँग्रेसचा आक्षेप
- शिवेंद्रसिंहराजेंचा पत्ता कट; सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची माळ नितिन पाटलांच्या गळ्यात
- ओमायक्रॉनची चिंता वाढली: राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार? अजित पवार म्हणतात…
- देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध फौजदारी आरोप निश्चित; प्रतिज्ञापत्रात गुन्ह्यांची माहिती लपवल्याचे प्रकरण