मुंबई : मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकलनानंतर, राज्यात राजकीय वातावरण ढवळलं गेलं असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपलेली पाहायला मिळत आहे. राज्य सरकार मराठा आरक्षणाचा कायदा न्यायालयात टिकवू शकलं नाही, असं म्हणत एकीकडे विरोधक ठाकरे सरकारवर निशाणा साधत आहेत, तर दुसरीकडे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची देखील मागणी होत आहे.
दरम्यान, “चंद्रकांत पाटलांना मराठा आरक्षण कायद्यातील काय कळतं? उगाच काहीतरी चुकीची माहिती ते देत असतात”, अशी टीका राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली होती. यावरून आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली असून, “अशोक चव्हाणांनी औकातीत राहावे”, असा टोकाचा इशारा त्यांनी दिला आहे.
आज मराठा आरक्षणासंदर्भात प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी, “अशोक चव्हाणांनी केंद्राकडे बोट दाखवू नये. स्वत: च्या राज्यासाठी त्यांनी काहीतरी करून दाखवावे. त्यांनी त्यांच्या औकातीत राहावे. त्यांची औकात काय आहे, हे आम्हाला माहीत आहे. त्यांनी आम्हाल, आम्ही काय करायचं ते सांगू नये”, असा इशारा देताना चंद्रकांत पाटलांची जीभ घसरल्याचे पाहायला मिळाले आहे.
Read Also :
- मी भाजप खासदार असताना माझा देखील फोन टॅप झाला, सरकारने कारवाई करावी
- ठाकरे सरकारनेही मोदी सरकारच्या पाऊलावर पाऊल टाकावं, छत्रपती संभाजीराजेंनी केली मागणी
- ‘राज्याचा आभासी कारभार करणाऱ्यांना, असले राजकारण शोभत नाही’
- मराठा आरक्षण : ‘तातडीने ही फेरविचार याचिका दाखल केल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार’
- मराठा आरक्षणावर केंद्राची पुनर्विचार याचिका, अशोक चव्हाण म्हणाले…