मुंबई : भाजपने बेळगाव महापालिकेवर निर्विवाद वर्चस्व राखून सत्ता काबीज केल्यांनतर आणि मए समितीचा दारुण पराभव झाल्यांनतर संजय राऊत यांनी, भाजपवर टीका करताना राऊतांनी, “आमचे लोक संघर्ष करतात, लाठ्या खातात, तुरुंगात जातात. त्याचं कौतुक असायला हवं, मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटता. लाज वाटत नाही?” असा संतप्त सवाल केला होता, तर आज त्यांनी, “बेळगावला महाराष्ट्रात घेण्याचा ठराव संमत करून दाखवा!” असं आव्हान भाजपला दिलं आहे.
“बेळगावला महाराष्ट्रात घेण्याचा ठराव संमत करून दाखवा!” राऊतांचं भाजपला आव्हान
दरम्यान, राऊतांच्या आजच्या आव्हानाला भाजप मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘महाराष्ट्रात विश्वासघाताने सत्ता मिळवून दोन वर्ष होतील औरंगाबादच संभाजी नगर झाल नाही कधी होणारं? शेतकऱ्याला बांधावर मदत देऊ असं मुख्यमंत्री म्हणाले होते. त्यांना अजूनही मदत मिळाली नाही. सत्तेसाठी मराठी माणसाला कधीच वाऱ्यावर सोडल आहे त्यामुळे मराठीचा ठेका आपल्याला या भ्रमातून बाहेर या,” अशी जोरदार टीका केली आहे.
महाराष्ट्रात विश्वासघाताने सत्ता मिळवून दोन वर्ष होतील
औरंगाबादच संभाजी नगर झाल नाही कधी होणारं?
शेतकऱ्याला बांधावर मदत देऊ म्हणाले होते @OfficeofUT अजून नाही मिळाली.
सत्तेसाठी मराठी माणसाला कधीच वाऱ्यावर सोडल आहे त्यामुळे मराठीचा ठेका आपल्याला या भ्रमातून बाहेर या. https://t.co/1D9w7cwpW8— Keshav Upadhye (@keshavupadhye) September 8, 2021
तब्बल ८ वर्षांनंतर बेळगाव महापालिकेवर भाजपने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केल्याच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी ट्विट करत भाजपला, “बेळगावात एकीकरण समितीचा पराभव घडवून आणला. भाजपाचे महाराष्ट्रातील पुढारी म्हणतात आमचा भगवा बेळगावर फडकला, मग एक करा. पालिकेच्या पहिल्या सभेत बेळगाव महाराष्ट्रात विलीन करण्याचा ठराव मंजूर करा. महाराष्ट्रात पेढे वाटून आनंद व्यक्त करणाऱ्या भाजपने लगेच ही मागणी करावी. तरच तुमचा भगवा खरा!”, असं आव्हान दिलं होतं.
“बेळगाव तो झांकी है, मुंबई अभी बाकी है, चंद्रकांत पाटलांचे शिवसेनेला थेट आव्हान
तसेच त्यांनी, ‘बेळगावात मराठी माणसाचा पराभव झाल्याबद्दल आज महाराष्ट्रात काहींना आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत. मराठी माणूस हरल्यानंतर पेढे वाटले जात आहेत. महाराष्ट्राचंया इतिहासात इतकी नादानी आणि नालायकपणा झाला नाही. मराठी माणसाच्या बाबतीत आतापर्यंत गद्दारी कोणी केली नव्हती. आमचे लोक संघर्ष करतात, लाठ्या खातात, तुरुंगात जातात. त्याचं कौतुक असायला हवं, तिथे पेढे कसले वाटताय?” असा संतप्त सवाल त्यांनी भाजपला केला होता.
Read Also :
- “संघर्षाचं कौतुक करायला हवं, पेढे काय वाटताय? हा आनंद तर…” राऊतांची खोचक टीका
- मोठी बातमी! ठाकरे सरकारची पोलखोल करणाऱ्या सोमैय्यांना आता ‘Z’ दर्जाची सुरक्षा
- ‘या’ अधिकाऱ्यावर होती हिरेनच्या हत्येची जबाबदरी, NIA च्या आरोपपत्रात मोठा खुलासा
- विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने कंबर कसली; देवेंद्र फडणवीसांवर पक्षाने सोपवली मोठी जबाबदारी
- पेडणेकर, जाधव, कांबळे, धोत्रे, पाटील हे मराठी नाहीयेत का?; गोपीचंद पडळकरांचा सवाल