मुंबई : शिवसेना नेमकी कुणाची? धनुष्यबाणावर हक्क नेमका कुणाचा? यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. कोर्टात सध्या दोन्ही बांजूच्या वकिलांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात येत आहे. यातच आता उद्धव ठाकरे यांना विविध संघटनांकडून, राजकीय पक्षांकडून चांगलच बळ मिळत आहे. सध्या अनेक पक्षाचे नेते शिवसेनेत प्रवेश करीत आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात सध्या शिवसेनेचीच चर्चा सुरू आहे.
“शरद पवारांचं नाव अन् काम वापरून तुम्ही किती दिवस मोठे व्हाल?”
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत जुन्नर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाबा परदेशी, मा.पंचायत समिती सदस्य सुनिल ढवळे, मा. उपसभापती (पंचायत समिती, खेड) अमोल पवार, खेड येथील भाजप युवा मोर्चा अध्यक्ष राहुल येवले, खरेदी विक्री संघाचे संचालक चेतन बोजे यांनी व इतर कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
“शिरूरच्या राजकारणात अशी गद्दार लोकं आढळता कामा नये”; ठाकरेंचा आढळराव पाटलांवर निशाणा
तसेच काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज शिवबंधन बांधून उमरगा येथील काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दिपक जवळगे, धाराशिव पंचायत समितीचे उपसभापती शाम जाधव नगरसेवक प्रदीप घोणे, गणेश खोचरे, पंकज पडवळ, नाना घाडगे, महेश काटे व सहकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्याचबरोबर भाजपचे ज्येष्ठ नेते, मुंबईचे माजी उपमहापौर, स्व. डॉ. राम. बारोट यांचे चिरंजीव नीरव बारोट यांनी देखील शिवसेनेत आज प्रवेश केला.
“शिवसेनेला लागलेली गद्दारीची कीड रामदास कदमांनीच रूजवली” राऊतांचा हल्लाबोल
त्याचबरोबर अलिकडेच शिर्डी विधानसभा मतदार संघाचे संपर्कप्रमुख, मोरे माऊली, वारकरी संप्रदाय महाराष्ट्र राज्य प्रसारक व प्रचारक उद्धव कुमठेकर, तसेच श्री श्रेत्र आळंदी येथील वारकरी भक्तांनी मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. आळंदी येथे वारकरी भक्तांसाठी रूग्णालय, वारकरी भवन, उभारण्याबाबत शिवसेना पाठपुरावा करून सर्व भक्तांना न्याय मिळवून देण्यासाठी कटीबद्ध आहे, असं सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी आपला पाठिंबा उद्धव ठाकरेंना जाहीर केला. यावेळी उपसभापती निलम गोऱ्हे, उपस्थित तसेच वारकरी मंडळी देखील उपस्थित होती.
Read also
- “ज्यांनी शिक्षणाची दारी खुले केली, ते देखील आपले देव”; भुजबळांचं भाजपला प्रत्युत्तर
- “मी ढळलो नव्हतो, पक्षाने मला ढळायला लावलं”; आढळराव पाटलांचं ठाकरेंना तिखट प्रत्युत्तर
- “राणेंनी शिवसेना सोडली तेव्हा रामदास कदम त्यांच्या बंगल्यावर..;” राऊतांचा गंभीर आरोप
- “ऐन सणाच्या तोंडावर केंद्र सरकारने महिला वर्गाची अक्षरशः चेष्टाच केली”; सुप्रिया सुळे
- “बोके खोके देत आहेत, त्या आमिषाला बळी पडू नका”; चंद्रकांत खैरे यांचं कार्यकर्त्यांना आवाहन