पत्रकात म्हटले आहे, शेट्टी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राज्यभर काम करावे अशी उपहासात्मक टीका केली. देशामध्ये ज्या-ज्यावेळी संकटे आली तेव्हा संघाचे स्वयंसेवक कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता झोकून देऊन काम करतात. संघ स्वयंसेवकांनी राज्यभर काम करावे, नागपूर मुख्यालयात काम करावे असे उपदेशाचे डोस पाजण्यापेक्षा आपण कोरोना महामारीच्या काळात काय काम केले हे एकदा स्पष्ट करावे.
सत्तेतील पदाशिवाय तुम्ही जगू शकत नाही हेच त्यातून सिद्ध होते. ज्या महाविकास आघाडीचे गोडवे गाताना थकत नाही त्या आघाडीच्या मुख्यमंत्र्यांना सांगून वीज बिले माफ करावीत. प्रसिद्धीसाठी वीज बिलांची होळी करून हा प्रश्न सुटणार नाही. सामान्य जनतेच्या अनेक प्रश्नाची उत्तरे प्रलंबित असताना व महाराष्ट्रातील सत्ताधीशांनी जनतेला वाऱ्यावर सोडले असताना फक्त स्वत:च्या आमदारकीसाठी आपण संघावर टीका करणे बंद करावे, असे या प्रत्रकात नमूद करण्यात आले आहे.